शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बारा कोटींसाठी तातडीने प्रयत्न करा

By admin | Updated: December 20, 2015 23:36 IST

परभणी : बाह्य वळण रस्त्यासाठी नियोजन विभागातून तरतूद असलेल्या १२ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी शहर विकासासाठी मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना आयुक्त राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत.

परभणी : बाह्य वळण रस्त्यासाठी नियोजन विभागातून तरतूद असलेल्या १२ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी शहर विकासासाठी मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना आयुक्त राहुल रेखावार यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहरातून वळण रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केला होता. शहरातून होणारी जड वाहतूक लक्षात घेऊन आणि वसमत रस्त्यावरील अपघातांची संख्या लक्षात घेऊन १९९६ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने ९.६५ कि. मी. अंतराच्या बाह्यवळण रस्त्यास मंजुरी दिली होती. या रस्त्याच्या भूसंपादनासाठी १६ वर्षानंतर नियोजन समितीमधून १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानंतर पाठपुराव्याचा अभाव आणि निधीच्या कमतरतेमुळे भूसंपादनाचे काम रेंगाळले आणि आता साबांचा बाह्य वळण रस्ता जवळपास रद्द झाला असून राष्ट्रीय महामार्गाचा नवीन बाह्यवळण रस्ता होत आहे. त्यामुळे बाह्य वळण रस्त्याच्या भूसंपादनासाठी तरतूद केलेला १२ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी भूसंपादन विभागाकडे पडून आहे. हा निधी शहर विकासासाठी वापरता येणे शक्य आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, शहर स्वच्छता, पथदिव्यांची व्यवस्था, यासारख्या विकासकामांसाठी हा निधी वापरावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस प्रवीण देशमुख यांनी आयुक्तांकडे केली होती. त्यावर आयुक्तांनी तातडीने पालकमंत्री व मंत्रालयात या प्रश्नी पाठपुरावा करण्याच्या सूचना संंबंधित विभागाला दिल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गसाठी ३५० कोटींची मंजुरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ अंतर्गत मानवत रोड ते मालेगाव या ८६.६० कि.मी.अंतराच्या प्रकल्पासाठी ३५० कोटी रुपयांना केंद्र शासनाची मंजुरी मिळाली आहे. ईपीसी मॉडेल अंतर्गत परभणी बाह्य वळण रस्त्यासाठी अस्तित्वातील लांबीचे ७ मीटर रुंदीचे १० मीटरपर्यंत रुंदी वाढविणे निश्चित आहे. त्यासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेचा भाग असलेली कॅपीटल ए अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे. त्यानंतर मोजणी होऊन केंद्र शासनाच्या निधीतून भूसंपादनाची प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे भूसंपादनासाठी तरतूद केलेला नियोजनचा निधी शहराच्या विकासासाठी घेणे शक्य असल्याचे प्रवीण देशमुख यांनी सांगितले.