शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

खाम, सुखना नदीच्या पाण्यावर विषारी शेती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:55 IST

खाम, सुखना नदीच्या विषारी पाण्यावर मागील अनेक वर्षांपासून काही शेतकरी पालेभाज्यांची शेती करीत आहेत. औरंगाबादकरांच्या आरोग्यासोबत खेळणाऱ्या या शेतकऱ्यांवर आजपर्यंत कोणत्याच शासकीय यंत्रणेने कारवाईचा बडगा उगारला नाही. नदीपात्रातील पाणी मोटारी लावून ओढण्याचे काम २४ तास सुरू असते.

ठळक मुद्देबारामाही उद्योग : औरंगाबादकरांच्या आरोग्यासोबत खेळ, कोणतीच शासकीय यंत्रणा कारवाई करीत नाही

औरंगाबाद : खाम, सुखना नदीच्या विषारी पाण्यावर मागील अनेक वर्षांपासून काही शेतकरी पालेभाज्यांची शेती करीत आहेत. औरंगाबादकरांच्या आरोग्यासोबत खेळणाऱ्या या शेतकऱ्यांवर आजपर्यंत कोणत्याच शासकीय यंत्रणेने कारवाईचा बडगा उगारला नाही. नदीपात्रातील पाणी मोटारी लावून ओढण्याचे काम २४ तास सुरू असते. भूमिगत गटार योजनेमुळे तर अनेक शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळाल्यासारखे झाले आहे. महापालिकेने आतापर्यंत दोन वेळेस कारवाईचा बडगा उगारला. प्रत्येक वेळी शेतकºयांच्या विरोधाला प्रशासनास सामोरे जावे लागले.बाजारात हिरव्या भाज्या दिसल्या की कोणीही सुखावतो. या पालेभाज्या दूषित पाण्यावर उगविण्यात आल्या असतील, अशी शंकाही आपल्या मनात येत नाही. मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराबाहेर बाराही महिने हिरवीगार दिसणारी शेती नाल्याच्या दूषित पाण्यावर बहरत आहे. या भाज्यांमध्ये शिसे, पारा, जस्त, तांबे, फिनेल, रंग, धुण्याचा सोडा, अमोनियम, फ्लोराईड आणि कोबाल्टसारख्या जड धातूंचा शिरकाव असतो. या पालेभाज्या खाल्ल्यावर तात्काळ परिणाम दिसत नसला तरी भविष्यात यामुळे किडनी, यकृताचे विकार, अर्धांगवायू, लिव्हर सोरायसिस यासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. या भाज्या खाल्ल्याने कॅन्सरचा धोका होण्याची शक्यता असते. शहरातील खाम नदीत (नाला) सोडल्या जाणाºया १३ पेक्षा अधिक नाल्यांच्या या प्रदूषित पाण्यावर नदीकाठचे शेतकरी पालेभाज्या आणि विविध पिके घेत आहेत. नाल्यांमधून नदीमध्ये औद्योगिक व नागरी वसाहतींमधील सांडपाणी जात असल्याने हे पाणी आरोग्यास अपायकारक ठरत आहे. या पाण्यात जड धातूसोबतच मानवी विष्ठाही जाते. जड धातू व मानवी विष्ठेतील विषाणू या भाज्यांमध्ये जातात.कोणत्या भागात सर्वाधिक शेतीसुखना नदीपात्रातील शेतीवर चिकलठाणा, हर्सूल, जाधववाडी, मिसारवाडी, पॉवरलूम आदी भागात मोठ्या प्रमाणात शेती होते. खाम नदीच्या पात्रातील पाण्यावर छावणी लोखंडी पुलापासून वाळूजच्या वळदगावपर्यंत हजारो एकर शेती करण्यात येते. या दूषित पाण्याच्या शेतीवर कारवाई करण्याचे धाडस आजपर्यंत एकाही शासकीय यंत्रणेने दाखविले नाही.भूमिगत गटार योजना संजीवनीमहापालिकेने ३५० कोटी रुपये खर्च करून शहराच्या चारही बाजूंनी भूमिगत गटार योजनेचे काम केले आहे. शहराबाहेरील मोठ्या ड्रेनेजलाईनमधून किमान ९० ते १०० एमएलडी पाणी वाहत असते. नक्षत्रवाडी भागात या दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. मागील दोन वर्षांपासून अनेक शेतकरी भूमिगत गटार योजनेच्या चेम्बरमधून पाणी चोरी करीत आहेत. मनपाने दोन वेळेस मोटारी जप्त केल्या. त्याचा कोणताच परिणाम शेतकºयांवर झाला नाही.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादriverनदी