शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

खाम, सुखना नदीच्या पाण्यावर विषारी शेती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:55 IST

खाम, सुखना नदीच्या विषारी पाण्यावर मागील अनेक वर्षांपासून काही शेतकरी पालेभाज्यांची शेती करीत आहेत. औरंगाबादकरांच्या आरोग्यासोबत खेळणाऱ्या या शेतकऱ्यांवर आजपर्यंत कोणत्याच शासकीय यंत्रणेने कारवाईचा बडगा उगारला नाही. नदीपात्रातील पाणी मोटारी लावून ओढण्याचे काम २४ तास सुरू असते.

ठळक मुद्देबारामाही उद्योग : औरंगाबादकरांच्या आरोग्यासोबत खेळ, कोणतीच शासकीय यंत्रणा कारवाई करीत नाही

औरंगाबाद : खाम, सुखना नदीच्या विषारी पाण्यावर मागील अनेक वर्षांपासून काही शेतकरी पालेभाज्यांची शेती करीत आहेत. औरंगाबादकरांच्या आरोग्यासोबत खेळणाऱ्या या शेतकऱ्यांवर आजपर्यंत कोणत्याच शासकीय यंत्रणेने कारवाईचा बडगा उगारला नाही. नदीपात्रातील पाणी मोटारी लावून ओढण्याचे काम २४ तास सुरू असते. भूमिगत गटार योजनेमुळे तर अनेक शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळाल्यासारखे झाले आहे. महापालिकेने आतापर्यंत दोन वेळेस कारवाईचा बडगा उगारला. प्रत्येक वेळी शेतकºयांच्या विरोधाला प्रशासनास सामोरे जावे लागले.बाजारात हिरव्या भाज्या दिसल्या की कोणीही सुखावतो. या पालेभाज्या दूषित पाण्यावर उगविण्यात आल्या असतील, अशी शंकाही आपल्या मनात येत नाही. मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराबाहेर बाराही महिने हिरवीगार दिसणारी शेती नाल्याच्या दूषित पाण्यावर बहरत आहे. या भाज्यांमध्ये शिसे, पारा, जस्त, तांबे, फिनेल, रंग, धुण्याचा सोडा, अमोनियम, फ्लोराईड आणि कोबाल्टसारख्या जड धातूंचा शिरकाव असतो. या पालेभाज्या खाल्ल्यावर तात्काळ परिणाम दिसत नसला तरी भविष्यात यामुळे किडनी, यकृताचे विकार, अर्धांगवायू, लिव्हर सोरायसिस यासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. या भाज्या खाल्ल्याने कॅन्सरचा धोका होण्याची शक्यता असते. शहरातील खाम नदीत (नाला) सोडल्या जाणाºया १३ पेक्षा अधिक नाल्यांच्या या प्रदूषित पाण्यावर नदीकाठचे शेतकरी पालेभाज्या आणि विविध पिके घेत आहेत. नाल्यांमधून नदीमध्ये औद्योगिक व नागरी वसाहतींमधील सांडपाणी जात असल्याने हे पाणी आरोग्यास अपायकारक ठरत आहे. या पाण्यात जड धातूसोबतच मानवी विष्ठाही जाते. जड धातू व मानवी विष्ठेतील विषाणू या भाज्यांमध्ये जातात.कोणत्या भागात सर्वाधिक शेतीसुखना नदीपात्रातील शेतीवर चिकलठाणा, हर्सूल, जाधववाडी, मिसारवाडी, पॉवरलूम आदी भागात मोठ्या प्रमाणात शेती होते. खाम नदीच्या पात्रातील पाण्यावर छावणी लोखंडी पुलापासून वाळूजच्या वळदगावपर्यंत हजारो एकर शेती करण्यात येते. या दूषित पाण्याच्या शेतीवर कारवाई करण्याचे धाडस आजपर्यंत एकाही शासकीय यंत्रणेने दाखविले नाही.भूमिगत गटार योजना संजीवनीमहापालिकेने ३५० कोटी रुपये खर्च करून शहराच्या चारही बाजूंनी भूमिगत गटार योजनेचे काम केले आहे. शहराबाहेरील मोठ्या ड्रेनेजलाईनमधून किमान ९० ते १०० एमएलडी पाणी वाहत असते. नक्षत्रवाडी भागात या दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. मागील दोन वर्षांपासून अनेक शेतकरी भूमिगत गटार योजनेच्या चेम्बरमधून पाणी चोरी करीत आहेत. मनपाने दोन वेळेस मोटारी जप्त केल्या. त्याचा कोणताच परिणाम शेतकºयांवर झाला नाही.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादriverनदी