शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उर्दू भाषेच्या विद्यार्थ्यांना मराठीचा गोडवा!; मराठीत मुख्यमंत्री, महापौरांना लिहिली हजारो पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 18:59 IST

उर्दू भाषेप्रमाणेच त्यांना मराठीचा गोडवा वाटावा म्हणून पत्रलेखनाचा उपक्रम.

ठळक मुद्देउर्दू भाषेच्या विद्यार्थ्यांना मराठीत लिहिणे, वाचणे सहसा अवघड जाते.

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : मोबाईलच्या युगात शालेय विद्यार्थ्यांना आज पोस्टकार्ड काय आहे? हे माहीतच नाही. तीन दशकांपूर्वीपर्यंत पोस्ट विभागामार्फत पत्रव्यवहार करण्यात येत होता. या दुर्मिळ आठवणींना उजाळा देण्याचे काम रीड अ‍ॅण्ड लीड फाऊंडेशनने सुरू केले आहे. उर्दू भाषेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही मराठीचा गोडवा वाटावा म्हणून मराठीत मुख्यमंत्री, महापौर यांच्या नावाने विविध विषयांवर पत्र लिहून घेण्यात येत आहेत. बुधवारी मराठी भाषा दिनानिमित्त आणखी व्यापक प्रमाणात हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मिर्झा अब्दुल खय्युम नदवी यांनी दिली.

जानेवारी २०१९ पासून रीड अ‍ॅण्ड लीड फाऊंडेशनने शहरातील उर्दू भाषेच्या विविध शाळांमध्ये शुद्ध मराठी पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे संयोजकांकडून शहरातील सर्वच उर्दू भाषेच्या शाळांमध्ये मराठी पत्रलेखन स्पर्धा घेण्याचे निश्चित करण्यात आले. २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने शहरातील ५७ उर्दू हायस्कूल, २५५ प्राथमिक शाळांमध्ये पत्रलेखन स्पर्धा घेण्यात येणार आहे. २५ हजार पोस्टकार्ड आतापर्यंत पोस्टाकडून घेण्यात आले आहेत. त्यातील १६ हजार विद्यार्थ्यांनी ते लिहून दिले आहेत. 

विद्यार्थ्यांना ‘माझ्या शहराला भेट दिलीच पाहिजे कारण...’, ‘माझ्या शहरातील चांगला माणूस’, ‘माझ्या शहरातील प्रेक्षणीय स्थळ’, ‘आमच्या शहरातील अडचणी’, ‘माझे आवडते पुस्तक’, असे विषय देण्यात आले होते. मराठी भाषा दिनानिमित्त जास्तीत जास्त पत्र विद्यार्थ्यांकडून मराठी भाषेत लिहून घेण्यात येणार आहेत. या दिनाचे औैचित्य साधून विद्यार्थ्यांनी शाळेत फक्त मराठी भाषेतच संभाषण केले पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे नदवी यांनी नमूद केले. या उपक्रमाला ‘उड्डाण’ या संस्थेने सहकार्य केले आहे. 

उर्दू भाषेच्या विद्यार्थ्यांना मराठीत लिहिणे, वाचणे सहसा अवघड जाते. अनेक शाळांमध्ये द्वितीय भाषा मराठी असते. शाळेत विद्यार्थ्यांना मराठी बोलता येते, वाचता येते. अवघड विषय म्हणून अनेक विद्यार्थी मराठीकडे फारसे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. त्यामुळे उर्दू भाषेप्रमाणेच त्यांना मराठीचा गोडवा वाटावा म्हणून पत्रलेखन सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :Studentविद्यार्थीMarathi Bhasha Dinमराठी भाषा दिनSchoolशाळाPost Officeपोस्ट ऑफिस