शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईत नियमांचा अतिरेक नको

By admin | Updated: March 13, 2016 14:30 IST

हिंगोली : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे टंचाईत नियमांचा अतिरेक न करता प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांनी तात्काळ टँकरची व्यवस्था करावी,

हिंगोली : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे टंचाईत नियमांचा अतिरेक न करता प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांनी तात्काळ टँकरची व्यवस्था करावी, असा आदेश पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी येथे आयोजित बैठकीत दिला.खा. राजीव सातव, आ.रामराव वडकुते, आ.तान्हाजी मुटकुळे, आ.डॉ.संतोष टारफे, जिल्हाधिकारी तुकाराम कासार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड, अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, ए.एम. देशमुख, बी. पी. लोंढे, खुदाबक्ष तडवी, लतिफ पठाण, किशोर मास्ट, पी.पी. शेळके आदी उपस्थित होते.एप्रिल-मेमध्ये टंचाई गंभीर होणार आहे. त्यामुळे या काळात परिणामकारक अंमलबजावणी व्हावी. प्रशासन जनतेच्या पाठीही आहे, याची जाणीव त्यांना झाली पाहिजे. सेनगाव तालुक्यातील हत्ता येथे सोमवारपासून चारा छावणी सुरू करण्याची सूचनाही त्यांनी दिली. तर ग्रा.पं.चा टँकरचा प्रस्ताव आल्यानंतर पाच दिवसांत तेथे उपाययोजना झाली पाहिजे. दुष्काळात रोहयोची कामे मोठ्या प्रमाणात सुरू व्हावीत. कामे सुरू केली जात नसल्याची तक्रार आल्यास थेट अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करू. मात्र कामे सुरू केल्यावर तक्रारी झाल्यास कारवाई होणार नाही, असे स्पष्ट केले. शेततळे व सिंचन विहिरी झाल्यास भविष्यात दुष्काळ राहणार नाही. नरेगात ही कामे व्हावी. यापुढे दर पंधरा दिवसांनी आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी म्हणाले, टंचाईत ३९ विहिरी मंजूर केल्या. त्यापैकी २४ ला पाणी लागले आहे. तर जलयुक्तमध्ये २७३८ पैकी २0१६ कामे पूर्ण झाली. ६८५ कामे शिल्लक असून ३७ प्रगतीपथावर आहेत. आतापर्यंत ३४ कोटी ६१ लाखांचा खर्च झाला आहे. खासदार-आमदारांनीही विविध कामांबाबत सूचना देत सुधारणेची अपेक्षा व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)लोकप्रतिनिधींनी कामांना भेटी द्याव्यातजलयुक्त शिवार योजनेतील कामे दर्जेदार होणे अपेक्षित आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी या कामांना सातत्याने भेटी दिल्या पाहिजेत. शेतकऱ्यांसाठीची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे, असे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तर यात यावर्षी २६ कोटी मंजूर असून ७ कोटी मिळाले. उर्वरित मार्च एण्डपर्यंत मिळतील, असेही स्पष्ट केले. ग्रामीण भागातील यात्रौत्सवात तमाशा मंडळांना गावाची मागणी व शांततेत पार पडण्याची हमी असल्यास परवानगी देण्यास सांगितले. यानंतर विकासकामे व कायदा व सुव्यस्थेसाठी गावपातळीवर बैठका घेण्यात येतील, असेही ते म्हणाले. तर जलेश्वर व चिरागशहा तलावातील गाळ काढण्याचे काम सोमवारपासून सुरू करण्याचा आदेश प्रशासनाला दिला. तालुका क्रीडा संकुलाच्या मुद्यावर आ.तान्हाजी मुटकुळे हे आक्रमक होत असताना जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी मात्र जिल्ह्यातील रिक्त पदांमुळे विकासकामांवर परिणाम होत असल्याचे सांगून त्यासाठी आधी प्रयत्न करा, असे सांगितले. प्रश्न कोणताही असो पालकमंत्री त्यावर सोमवारपासून अंमलबजावणी होईल, हे उत्तर देत होते. त्यामुळे यापूर्वीच्या कामांचा दाखला पत्रकारांनी दिल्यानंतर हास्यविनोद झाला. एकप्रकारे पालकमंत्र्यांनाही आपला आश्वासनांवरच जास्त भर असल्याचे लक्षात आले असावे.टंचाईचा काळ असताना प्रशासनात समन्वय नसल्याचा आरोप बैठकीनंतर खा. राजीव सातव यांनी केला. त्यामुळे आज टंचाईवर बैठक असताना तीन तालुक्यांचे गटविकास अधिकारीच आले नाहीत. ते पुढे कसे गांभिर्याने कामे करतील. तर रोहयोची कामेही काही ठरावीक भागात होत आहेत. काही ठिकाणी ती सुरू करण्यास टाळाटाळ दिसते. यात प्रामुख्याने विहिरींची कामे झाली पाहिजे. तर जलयुक्त शिवार योजनेत ठराविक टप्प्यांतच कामे होत आहेत. या योजनेचा चांगला फायदा होण्यासाठी माथा ते पायथा हा नियम असूनही तो पायदळी तुडवत आहेत.कळमनुरी तालुक्यात प्रामुख्याने रोजगार हमी योजनेची कामे करण्याची गरज आहे. या तालुक्यात नगण्या कामे सुरू आहेत, असे खा. सातव म्हणाले. त्याला दुजोरा देत आ.वडकुते यांनीही वसमतलाही दुष्काळ आहे तर कामे का सुरू होत नाहीत, असा सवाल केला.