शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सत्य बोलल्याने व्यक्ती त्रस्त होऊ शकतो; पण पराभूत होत नाही : आचार्य महाश्रमणजी

By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 9, 2024 11:30 IST

आचार्यश्री महाश्रमणजी यांच्या साक्षीने गोलवाडीत तेरापंथ भवनाचे लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर : एकदा खोटे बोलले तर ते लपविण्यासाठी अनेकदा खोटे बोलावे लागते. सत्य बोलल्याने व्यक्ती त्रस्त होऊ शकतो; पण पराभूत होत नाही. अंतिमत: सत्याचा विजय होतो. यामुळे खोटे बोलू नका, नेहमी खरे बोला. सत्य, अहिंसा, प्रेमभाव, मानवताच जगात ‘शांती’ निर्माण करू शकते, असा सत्यवादी जीवन जगण्याचा मंत्र, जैन श्वेतांबर तेरापंथ धर्म संघाचे ११वे आचार्य महाश्रमणजी यांनी येथे दिला. आचार्य महाश्रमणजींसह ८१ साधू - संतांचे पदयात्रेने मंगळवारी गोलवाडीत आगमन होताच समाजातील अबालवृद्धांनी जयघोष करीत त्यांचे स्वागत केले. आचार्यश्रींच्या साक्षीने तेरापंथ भवनाचे लोकार्पण करण्यात आले.

यानिमित्त आयोजित धर्मसभेत सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा, मौलाना हाफीज अन्सारी, बिशप एम. यू. कसाब, न्या. कैलासचंद कासलीवाल, वारकरी संप्रदायाचे आंधळे महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक अनिल भालेराव, विश्व हिंदू परिषदेचे राजीव जहागीरदार, सकल मारवाडी महासभेचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम दरख, जेम्स अंबिलढगे, सकल जैन समाजाचे उपाध्यक्षांसह विविध व्यावसायिक संघटनांचे पदाधिकारी, समाजबांधव मोठ्या संख्येने हजर होते. प्रारंभी मुनीश्री दिनेशकुमारजी व साध्वी प्रमुखा विश्रुतविभाजी यांनी मार्गदर्शन केले.

तेरापंथ युवक परिषदेच्या वतीने आचार्य महाश्रमण दीक्षा कल्याण महोत्सव विशेषांकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ‘आचार्यश्री महाश्रमणजी फक्त तेरापंथ धर्म संघाचे आचार्य नव्हे, तर मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचे ते आचार्य आहेत’, असा उल्लेख राजेंद्र दर्डा यांनी केला. अवघ्या १११ दिवसांत तेरापंथ भवनची इमारत उभारल्याबद्दल आचार्यश्री महाश्रमण अक्षय्य तृतीया प्रवासव्यवस्था समितीचे अध्यक्ष सुभाष नहार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. भवन उभारण्यात सहकार्य लाभल्याबद्दल सुभाष नहार यांनी सर्वांचे आभार मानले. महावीर पाटणी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अनिल नहार, सुनील राका, राजेंद्र डोसी, संजय सेठिया, महेंद्र सुराणा, कौशिक सुराणा, अंकुर लुणिया, राजकुमार बाठिया, तेरापंथ युवक परिषदेचे पदाधिकारी यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

विरोधकांवर खोटे आरोप करू नकाआचार्यश्री महाश्रमणजी यांचे दर्शन घेण्यासाठी लोकप्रतिनिधी धर्मसभेत आले होते. निवडणूक वातावरण लक्षात घेऊन आचार्यश्री म्हणाले की, प्रचारामध्ये विरोधकांवर आरोप करताना ‘खोटे’ आरोप करू नका. सत्यता असेल तरच आरोप करा. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदिपान भुमरे, मंत्री अतुल सावे, आ. संजय शिरसाठ, आ. प्रदीप जैस्वाल, आ. प्रशांत बंब, शिवसेनेचे (उबाठा) नेते चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आचार्यश्रींचे आशीर्वाद घेतले.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAurangabadऔरंगाबाद