शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक नियुक्त्यांत ‘शाळा’!

By admin | Updated: May 26, 2014 00:24 IST

बीड : जिल्हा परिषदच्या वस्तीशाळा शिक्षक नियुक्त्यांमध्येच ‘शाळा’ केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे़ बदल्या, पदोन्नत्या, दर्जावाढ ही संपूर्ण प्रक्रिया आचारसंहितेच्या कात्रीत आहे़

बीड : जिल्हा परिषदच्या वस्तीशाळा शिक्षक नियुक्त्यांमध्येच ‘शाळा’ केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे़ बदल्या, पदोन्नत्या, दर्जावाढ ही संपूर्ण प्रक्रिया आचारसंहितेच्या कात्रीत आहे़ तत्पूर्वीच जि़प़ ने काही निमशिक्षकांना शिक्षक म्हणून कायमस्वरुपी आदेश दिले आहेत तर बंद वस्तीशाळेवरील निमशिक्षकांपैकी काहींनाच नियुक्ती आदेश दिले आहेत़ त्यामुळे वस्तीशाळा शिक्षकांच्या नियुक्त्या संशयाच्या भोवर्‍यात सापडल्या असून ‘सीईओं’चा हा प्रताप सध्या चर्चेचा विषय बनलाय. जिल्ह्यात एकूण वस्तीशाळा शिक्षकांची संख्या ६५० इतकी आहे़ याशिवाय विद्यार्थ्यांअभावी बंद पडलेल्या वस्तीशाळांवरील निमशिक्षकांचा आकडा १४७ इतका आहे़ शासनआदेशानुसार ज्या निमशिक्षकांनी डीएड पूर्ण केले आहे, त्यांची सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षक म्हणून नियुक्ती करायची होती़ तर बंद वस्तीशाळेवरील शिक्षकांना निमशिक्षक म्हणून कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या देऊन नंतर त्यांचे डीएड पूर्ण करुन घ्यायचे होते़ दरम्यान, जिल्ह्यात मुख्याध्यापकांची ४६९ पदे मंजूर आहेत़ १४७७ प्राथमिक पदवीधर तर ६९८८ सहशिक्षकांची पदे देखील मंजूर आहेत़ प्रत्यक्षात मात्र, ४१० मुख्याध्यापक, ४९९ प्राथमिक पदवीधर, ७३९७ सहशिक्षक कार्यरत आहेत़ महत्त्वाचे म्हणजे शंभरावर अतिरिक्त शिक्षकांनाही नियुक्तीची प्र्रतीक्षा आहे़ बदल्या, दर्जावाढ व पदोन्नत्या या प्रकिया पूर्ण झाल्यानंतर समायोजन केले जाणार होते; परंतु मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आणि आचारसंहितेमुळे सर्वच प्रक्रिया बंद झाली़ रिक्त जागा, उपलब्ध शिक्षक हे चित्र स्पष्ट नसताना जि़प़ ने ६५० पैकी २३८ निमशिक्षकांना शिक्षक म्हणून आदेश दिले आहेत़ आजही ४१२ निमशिक्षक शिक्षकपदाच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत़ याशिवाय बंद वस्तीशाळा शिक्षकांना निमशिक्षक म्हणून सामावून घ्या, असे १ मार्च २०१४ च्या शासनादेशात म्हटले होते़ त्यानुसार जि़प़ ने १४७ पैकी केवळ १०९ जणांना निमशिक्षक म्हणून आदेश दिले आहेत़ त्यामुळे निमशिक्षकांना शिक्षक तर बंद वस्तीशाळेवर कार्यरत कर्मचार्‍यांना निमशिक्षक म्हणून नियुक्त्या देताना उर्वरित लोकांना का डावलले? याचे उत्तर गुलदस्त्यात आहे़ याबाबत शिक्षणाधिकारी (प्रा़) भास्कर देवगुडे म्हणाले, आरटीईमुळे शिक्षकांच्या जागा वाढल्या आहेत़ वस्तीशाळा शिक्षकांना नियुक्त्या देण्याचे शासनाचेच आदेश आहेत़ पदोन्नत्या, दर्जावाढ व समायोजन पूर्ण झाल्यानंतरच कुठल्या शाळेवर कुणाला नियुक्त करायचे याचे आदेश काढण्यात येतील़ सध्या फक्त सेवेत सामावून घेतल आहे़ जागा शिल्लक न राहिल्यास त्यांना नियुक्त्या दिल्या जाणार नाहीत़ आदेश जुन्या तारखेत? पदवधीर मतदारसंघाची आचारसंहिता २० मे रोजी लागू झाली़ २३८ निमशिक्षकांना शिक्षक म्हणून तर बंद वस्तीशाळांमधील १०९ जणांना निमशिक्षक म्हणून नियुक्तीआदेश २३ मे रोजी मिळाले़ आदेशावर १७ मे रोजीचा उल्लेख आहे़ १७ रोजी आदेश निघाले तर ते संबंधितांच्या हातात पडण्यास पाच दिवसांचा अवधी का लागला? याचे कोडेही कायम आहे़ जुन्या तारखेत आदेश काढल्याचे कागदावर दिसत असले तरी प्रत्यक्षात आचारसंहिता लागू झाल्यावर आदेश निघाले, असे एका अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले़ सीईओ म्हणाले, ९०० जागा रिक्त सीईओ राजीव जवळेकर यांनी सांगितले, जिल्ह्याला ३५२ प्राथमिक तर २२३ उच्च प्राथमिक शाळांना मान्यता मिळाली आहे़ या शाळांमध्ये प्रत्येकी दोन शिक्षक नियुक्त करायचे आहेत़ वस्तीशाळांमधील २३८ जणांना शिक्षक म्हणून आदेश दिले असले तरी देखील ९०० वर पदे रिक्त राहतात़ त्यामुळे नियुक्त्या देण्यात घाई झाली असे नाही़ याउलट आणखी बाहेरुन शिक्षक पाचारण करावे लागतील, अशी स्थिती असल्याचे ते म्हणाले़ नियुक्त्या पारदर्शकच आहेत़ त्यात आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा तथ्यहीन असल्याचा दावाही त्यांनी ‘लोकमत’कडे केला. (प्रतिनिधी) उलाढालीचा ‘आगळा’ ‘पांडव’ प्रताप जुन्या वस्तीशाळांमधील ६५० पैकी ४१२ व बंद वस्तीशाळेवरील १४७ पैकी २८ जणांनाच का डावलले? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे़ विश्वसनीय सूत्रांनुसार वस्तीशाळा शिक्षक नियुक्त्यांत सीईओंच्या भोवती फिरणार्‍या कर्मचार्‍यांनीच उशिरापर्यंतच्या बैठकांत खलबते करुन सार्‍या चाव्या फिरविल्या़ वस्तीशाळा शिक्षकांतील पुढार्‍यांसोबत संपर्क वाढवून ‘उलाढाली’चा ‘आगळा’ ‘पांडव’प्रताप करण्यात आल्याची माहिती आहे़