शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलचा ताण होणार हलका

By admin | Updated: July 14, 2014 01:05 IST

औरंगाबाद : महसूलमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने औरंगाबाद तहसीलच्या विभाजनाचा प्रस्ताव नव्याने राज्य सरकारकडे नुकताच सादर केला आहे.

औरंगाबाद : महसूलमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने औरंगाबाद तहसीलच्या विभाजनाचा प्रस्ताव नव्याने राज्य सरकारकडे नुकताच सादर केला आहे. त्यानुसार औरंगाबाद पूर्व आणि औरंगाबाद पश्चिम अशा दोन तहसीलची शिफारस करण्यात आली आहे. विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजे महिनाभरात या प्रस्तावाला मंजुरी मिळून दोन तहसील अस्तित्वात येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. लोकसंख्येचा विचार करता औरंगाबाद तहसीलचे विभाजन करावे, अशी जुनीच मागणी आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी प्रस्तावाद्वारे शासनाकडे ही मागणी केलेली आहे. मात्र, त्यावर काहीही कार्यवाही झाली नव्हती. महिनाभरापूर्वी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत तहसील विभाजनाच्या विषयावर बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी विक्रमकुमार, महसूल उपायुक्त जितेंद्र पापळकर यांच्यासह इतरही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत आढावा घेतल्यानंतर थोरात यांनी तहसीलच्या विभाजनासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करून तातडीने सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हा प्रशासनाला नवीन प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव नुकताच राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असल्याचे उपविभागीय अधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी सांगितले. विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वीच म्हणजे महिनाभरात या प्रस्तावाला मंजुरी मिळून औरंगाबादेत दोन तहसील कार्यालये अस्तित्वात येतील, असे सूत्रांनी सांगितले. औरंगाबाद पूर्वचे कार्यक्षेत्रपूर्व मतदारसंघात ग्रामीण भागातील सुमारे २०० महसुली खेडी असणार आहेत. यातील काही खेडी सध्या पैठण आणि काही फुलंब्री विधानसभा मतदारसंघात येतात. पश्चिमचे कार्यक्षेत्रनव्याने स्थापन होणाऱ्या पश्चिम तहसीलअंतर्गत औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व आणि औरंगाबाद पश्चिम हे तीन विधानसभा मतदारसंघ असतील. आकृतिबंधही सादर महसूल खात्याच्या अप्पर मुख्य सचिवांकडे प्रस्ताव नुकताच सादर केला आहे. त्यात औरंगाबाद पूर्व आणि औरंगाबाद पश्चिम अशा दोन तहसील कार्यालयांची स्थापना करावी, असे म्हटले आहे. दोन्ही कार्यालयांसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधांचा आकृतिबंधही सादर करण्यात आला आहे.-बप्पासाहेब थोरात, उपविभागीय अधिकारी, औरंगाबादतहसीलच्या विभाजनाची गरज काय?औरंगाबाद जिल्ह्याची लोकसंख्या ३६ लाख ९५ हजार आहे. त्यापैकी सुमारे १८ लाख लोकसंख्या ही एकट्या औरंगाबाद तहसील कार्यक्षेत्रात राहते. उर्वरित १९ लाख लोकसंख्या ही जिल्ह्यातील ९ तहसील कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात येते. त्यामुळे साहजिकच औरंगाबाद तहसीलवर कामाचा प्रचंड ताण आहे. औरंगाबाद तहसीलअंतर्गत औरंगाबाद शहर आणि तालुक्यातील २२६ महसुली खेडी आहेत. यात शहराची लोकसंख्या १४ लाख असून, ग्रामीण भागाची लोकसंख्या चार लाख आहे. लोकसंख्येचा एवढा ताण असताना औरंगाबाद आणि लगतचा परिसर झपाट्याने वाढत आहे. परिणामी, या भागात जमिनीच्या अकृषक परवान्याची (एनए) प्रकरणे, जमिनीचे गैरव्यवहार वाढले आहेत. तसेच शहरालगत वर्ग-२ च्या म्हणजे शासकीय गायरान आणि कुळाच्या जमिनी खूप जास्त आहेत.