शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

आधार केंद्र सहा महिन्यांपासून बंद

By admin | Updated: October 29, 2014 00:46 IST

गेवराई : आधारकार्ड हा महत्वाचा दस्तऐवज व पुरावा ग्राह्य धरला जात आहे़ प्रत्येक ठिकाणी याची मागणी केली जात असल्याने आधारकार्ड काढण्यासाठी अनेकजण पुढाकार घेत आहेत़

गेवराई : आधारकार्ड हा महत्वाचा दस्तऐवज व पुरावा ग्राह्य धरला जात आहे़ प्रत्येक ठिकाणी याची मागणी केली जात असल्याने आधारकार्ड काढण्यासाठी अनेकजण पुढाकार घेत आहेत़ गेवराई तालुक्यातील आधारकार्ड केंद्र गेल्या सहा महिन्यांपासून बंद पडल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़गेल्या तीन वर्षांपासून आधारकार्ड नोंदणीचा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे़ आधारकार्ड हा बँक, मोबाईल सीमकार्ड, रहिवासी आदी ठिकाणी पुरावा म्हणून मागितले जात आहे़ यामुळे अनेकांनी आधारकार्डला प्राधान्य दिले होते़ जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाखांच्या जवळपास असून बहुतांश ग्रामीण भागातील लोकांनी आधारकार्ड काढले आहे़ मात्र अनेक ठिकाणी आधारकार्ड काढणे बाकी आहे़ आधारकार्ड नोंदणीसाठी शासनाच्या वतीने जिल्ह्यासाठी प्रारंभी ५ संस्थांतर्गत केंद्रे स्थापन करण्यात आली होती़ पैकी तीन संस्थांनी आपले काम बंद केल्यानंतर दोन संस्थांचे काम जिल्ह्यात सुरू होते़ या दोन संस्थांनी तालुक्याच्या ठिकाणी आपले केंद्र स्थापन केले होते़ त्याच ठिकाणी नोंदणी केली जायची़ मात्र आता परिस्थिती बदलली आहे़ आधारकार्ड काढण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या घटली असल्याने या कंपन्यांनी केंद्र बंद केले असल्याची बाब एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितली़आधारकार्ड केंद्र बंद केल्याने अनेकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे़ आधारकार्ड काढणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी अनेक नागरिक, युवक, महिला आधारकार्ड काढणे बाकी आहेत़ अनेक ठिकाणी आधारकार्डची मागणी केली जात असल्याने गेवराई शहरातील नागरिक केंद्रावर गेले असता तेथे हे केंद्र बंद असल्याचे समोर आले आहे़ त्यामुळे शासनाने आधार केंद्र त्वरीत सुरू करावे, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे़विशेष म्हणजे हे आधार नोंदणी केंद्र गेल्या सहा ते सात महिन्यांपासून बंद आहे़ अनेक वेळा मागणी करूनही आधार नोंदणी केंद्र बंद आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातील व गेवराई शहरातील लोकांना नोंदणीसाठी ज्या ठिकाणी नोंदणी सुरू आहे तेथे जावे लागत आहे़ बीड शहरातील जवळपास सर्व आधार नोंदणी केंद्र बंद करण्यात आलेले आहेत़ यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे़ हे आधारकार्ड नोंदणी केंद्र पुन्हा सुरू करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे़(वार्ताहर)