शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

जायकवाडीत आपत्कालीन पंपाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 11:09 PM

बाष्पीभवनामुळे जायकवाडी धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. जायकवाडीच्या पायथ्याशी जिथे मनपाच्या मोटारी बसविल्या आहेत, तेथे पाणी येण्याचे प्रमाण चांगलेच घटले आहे.

औरंगाबाद : बाष्पीभवनामुळे जायकवाडी धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. जायकवाडीच्या पायथ्याशी जिथे मनपाच्या मोटारी बसविल्या आहेत, तेथे पाणी येण्याचे प्रमाण चांगलेच घटले आहे. आपत्कालीन परिस्थितीत धरणाच्या मध्यभागी पाण्याच्या मोटारी बसविण्यात येणार आहेत. या पंपगृहाचे काम पाणीपुरवठा विभागाकडून सुरू करण्यात आले. याठिकाणी पत्र्याचे शेड उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे.

जायकवाडी धरणाने यंदा पुन्हा तळ गाठला आहे. सध्या चार टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे मनपाच्या पंपगृहातील उपसा घटला आहे. मनपाला दररोज १४० ते १५० एमएलडी पाण्याचा उपसा करावा लागतो. जायकवाडीतून सध्या १३५ एमएलडी पाणी मिळत आहे. शहरात १२० एमएलडी पाणी येत आहे. अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. चार ते पाच दिवसाआड अनेक वसाहतींना पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणी उपसा वाढविण्यासाठी धरणात अ‍ॅप्रोच चॅनलच्या डाव्या कालव्याला जोडल्या जाणाऱ्या टोकाजवळच असलेल्या आपत्कालीन पंपाच्या दुरुस्तीचे काम मनपाने हाती घेतले आहे. या कामासाठी १९ लाख रुपयांचा खर्च केला जात आहे. आपत्कालीन पंपांची साफसफाई करण्यात येत असून, त्याठिकाणी पत्र्याचे शेड उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येऊन आठवडाभरात ते काम पूर्ण केले जाणार आहे. पाणीपुरवठा तांत्रिक विभागाचे उपअभियंता बाबूराव घुले यांनी सांगितले की, जायकवाडी धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून, धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे अ‍ॅप्रोच कॅनॉलद्वारे पाणी आणून आपत्कालीन पंपाद्वारे उपसा केला जाणार आहे. शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न आहे.

शहरातील नो नेटवर्क एरियासह ज्या भागात पाईपलाईन टाकण्यात आलेल्या नाहीत, अशा भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव महापौरांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे सादर केला आहे. विभागीय आयुक्तांनी हा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना चार एमएलडी पाणी शहरातील टँकर भरण्यासाठी उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. पुढच्या आठवड्यात शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :WaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प