शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

दीडहजारासाठी चाकूने भोसकले; एकाचा उपचारादरम्यान मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

By योगेश पायघन | Updated: October 8, 2022 13:22 IST

हातउसने पैसे परत मागितल्याने केला तिघांवर हल्ला

औरंगाबाद : दीड हजार रुपयांच्या उसनवारीतून एकाने तिघांवर चाकूहल्ला केल्याची घटना २ ऑक्टोबर रोजी एसबीओए शाळेसमोरील पान टपरीजवळ घडली होती. यात गंभीर जखमी झालेल्या दोघांपैक्की एकाचा आज पहाटे २ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. रवींद्र हिम्मतराव कुंभारे पाटील (३५ रा. नवनाथ नगर एन ११ हडको) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर दुसरा जखमी प्रणील वंजारे याच्यावर उपचार सुरू आहेत. 

पोलिस उप निरीक्षक मारुती खिल्लारे यांनी सांगितले की, रिक्षाचालक विकास उत्तमराव अवसरमल (३१, रा. नवनाथनगर, हडको) २ आॅक्टोबरला रात्री ११ वाजता मनोज बनकरला उसने दिलेले दीड हजार रुपये मागण्यासाठी एसबीओए शाळेसमोरील कबीर पानटपरीजवळ गेला होता. अवसरमलने पैसे मागताच मनोज बनकरने पैसे देण्यास नकार दिला, तसेच तुला काय करायचे ते कर, अशी धमकी दिली. त्यावर स्वप्नील जाधवने भांडण करायचे का?, असे म्हणत कमरेचा चाकू काढून अवसरमलवर हल्ला केला. 

तेवढ्यात तेथे आलेले अवसरमलचे मित्र रवींद्र कुंभारे व प्रणील वंजारे हे मध्ये पडले. तोच स्वप्नीलने रवींद्र कुंभारे पाटीलच्या पोटात चाकू खुपसला. प्रणील वंजारे त्याला वाचविण्यासाठी गेला असता आकाश ऊर्फ सोन्या ठोंबरे याने कानशिलात चापट मारत रोखले. त्यावर स्वप्नील जाधवने प्रणीलच्या पाठीत चाकू खुपसला. ते जखमी होऊन जमिनीवर कोसळले. नागरिक मदतीसाठी धावले. त्यानंतर स्वप्नील जाधव, मनोज बनकर, आकाश ऊर्फ सोन्या ठाेंबरे हे तेथून पळून गेले. काही वेळातच पोलिसांची व्हॅन आली. त्यांनी जखमींना घाटीत दाखल केले. तीन आरोपींपैकी स्वप्नील जाधव आणि आकाश ऊर्फ सोन्या ठोंबरे या दोघांना विशेष पथकाचे उपनिरीक्षक रफी शेख यांनी तात्काळ अटक केली. त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे तर मनोज बनकर अद्याप फरार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद