शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनवरच भिस्त !

By admin | Updated: July 12, 2014 01:14 IST

रमेश शिंदे, औसा तब्बल महिनाभर पाऊस लांबल्याने खरीप पेरण्यांना उशीर झाला आहे़ उडीद आणि मूग पेरणीचा कालावधी संपला असल्याने शेतकऱ्यांची भिस्त आता सोयाबीनवरच अवलंबून आहे़

रमेश शिंदे, औसातब्बल महिनाभर पाऊस लांबल्याने खरीप पेरण्यांना उशीर झाला आहे़ उडीद आणि मूग पेरणीचा कालावधी संपला असल्याने शेतकऱ्यांची भिस्त आता सोयाबीनवरच अवलंबून आहे़ त्यामुळे तालुक्यात सोयाबीनच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. एक लाख खरिपाचे क्षेत्र असलेल्या या तालुक्यात ५० हजार हेक्टर्सपेक्षा अधिक क्षेत्र सोयाबीनने व्यापणार आहे. घरगुती बियाण्यांच्या उपलब्धतेमुळे आणि कृषी विभागाच्या जनजागृतीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी सोयाबीनच्या पेरणीकडे वळला आहे. औसा तालुका हा पावसाळी पाण्यावर अवलंबून असलेला तालुका. पण रोहिण्या, मृग आणि आर्र्द्रा ही पावसाळ्याची तिन्ही नक्षत्रे कोरडी गेली. पावसाअभावी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना पुनर्वसू नक्षत्राने हात दिला. तालुक्याच्या काही भागात दमदार तर काही भागात साधारण पण पेरण्यायोग्य पाऊस झाला. आता शेतकरी पेरण्यांच्या लगबगीत आहे. मागील तीन-चार वर्षांपासून निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी यावर्षी तरी किमान वेळेवर पाऊस होईल, ही अपेक्षा ठेवून होता. पण पावसाळाच तब्बल महिनाभर लांबला. उडीद-मुगासारख्या पिकांची मृग-आर्द्रात पेरणी करणे अपेक्षित आहे. पण त्या पेरण्याच न झाल्यामुळे आता शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या पेरणीकडे वळला आहे.२०१२-१३ च्या खरीप हंगामामध्ये औसा तालुक्यात १ लाख ८९ हजार क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. त्यामध्ये ४६ हजार ४६० हेक्टर्स क्षेत्रावर सोयाबीन, ५ हजार ३७ हेक्टर्स क्षेत्रावर उडीद तर २ हजार ७०५ हेक्टर क्षेत्रावर मुगाची पेरणी झाली होती. तर २०१३-१४ च्या खरीप हंगामात ८३ हजार ६९९ हेक्टर्स क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. त्यामध्ये ३६ हजार २०० हेक्टर्सवर सोयाबीन, ८ हजार ३०० हेक्टर्सवर उडीद तर ३ हजार ९०० हेक्टर्सवर मूग या पिकांची पेरणी झाली होती. २०१२-१३ पेक्षा २०१३-१४ मध्ये उडीद-मुगाचे क्षेत्र वाढले होते. पण यावर्षी थोड्याफार प्रमाणात मुगाची पेरणी होताना दिसतेय. पण उडीद मात्र शून्यावर राहण्याची स्थिती आहे. उडीद-मूग या पिकाखालील क्षेत्र आणि पेरण्यांना उशीर झाल्यामुळे अन्य काही क्षेत्रही सोयाबीनखाली येण्याची शक्यता आहे. सोयाबीनच्या बियाण्याचे भाव यावर्षी मोठ्या प्रमाणावर वाढले. पण त्यापूर्वीच कृषी विभागाने शेतकऱ्यांनी घरगुती बियाणे पेरावे म्हणून जनजागृती केली. तसेच बीज प्रक्रियेसंदर्भातही शेतकऱ्यांना गावोगावी जाऊन मार्गदर्शन केले होते. त्यामुळे यावर्षी शेतकरी बियाणे विकत घेण्याऐवजी घरगुती वापरत आहेत. तर कृषी सेवा केंद्रांवर अजूनही मोठ्या प्रमाणात बियाणे शिल्लक असल्याचे पहायला मिळत आहे. उशिरा झालेला पाऊस आणि विलंबाने होणाऱ्या पेरण्या यामुळे तालुक्यात ५० हजार हेक्टर्सपेक्षा अधिक क्षेत्र हे सोयाबीनने व्यापणार आहे़शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी़़़ सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे सांगून पंचायत समितीचे कृषी अधिकारी सतीश शिंदे म्हणाले की, पण घरगुती बियाणे वापरताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. काही भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगला ओलावा झाल्यानंतरच पेरणी करावी. बियाणे पेरणी करताना जास्त खोल जाणार नाही, याची काळजी घ्यावी. बीज प्रक्रिया करताना बियाणाचे टरफल निघणार नाही, याचीही काळजी घेण्याचे आवाहन सतीश शिंदे यांनी केले आहे.