शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: निकालानंतर तामिळनाडूत राजकीय भूकंप, AIDMK पक्षात मोठी फूट पडणार?
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
5
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
6
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
7
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
8
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
9
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
11
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
12
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
13
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
14
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
15
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
16
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
17
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
18
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

साडेसतराशे हेक्टर क्षेत्रावर होणार पेरणी

By admin | Updated: June 8, 2014 00:53 IST

पाटोदा : तालुक्यात शेतकऱ्यांनी मशागती पूर्ण केल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांची मशागत अंतिम टप्प्यात आहे.

पाटोदा : तालुक्यात शेतकऱ्यांनी मशागती पूर्ण केल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांची मशागत अंतिम टप्प्यात आहे. तालुक्यात यंदाची खरीप पेरणी साडेसतराशे हेक्टरवर होणार असून शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनेअंतर्गत बी- बियाणे पुरविण्यात येणार असल्याचे प्रभारी कृषी अधिकारी आर.एफ. शिदोरे यांनी सांगितले. पाटोदा तालुक्यात मागील तीन वर्षांपासून शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे. यंदा तरी पाऊस काळ चांगला होईल या आशेने शेतकऱ्यांनी शेतीतील मशागतीची कामे पूर्ण केलेली आहेत. तर काही शेतकऱ्यांची कामे शेवटच्या टप्प्यात आहेत. यंदा पाटोदा तालुक्यात साडेसतराशे हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होणार आहे. शासनाच्या कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि खते पुरविण्यात येणार आहेत, असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. असे असले तरी शासनाकडून मात्र बी- बियाणांच्या योजनांसंदर्भात ठोस अशा मार्गदर्शक सूचना कृषी कार्यालयाला प्राप्त झाल्या नसल्याचे सांगितले जाते. सध्या मान्सून केरळात दाखल झाला असून येत्या काही दिवसांतच मराठवाड्यात मान्सूनचे आगमन होईल, असे संकेत हवामान खात्याने नुकतेच दिले. यामुळे शेतकरी मोठ्या लगबगीने शेतातील कामे उरकते घेत आहे.कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या योजना व उपक्रम राबविल्या जात आहेत. यामध्ये चालू वर्षी तालुका कृषी कार्यालयांतर्गत राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमामधून गतिमान वैरण विकासासाठी २०० हेक्टर, कापूस विकासासाठी ५० हेक्टर क्षेत्राला लाभ दिला जाणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत बाजरी २०० हेक्टर, कडधान्य १०० हेक्टर तर एन.एम.ओ.पी. अंतर्गत सोयाबीन १०० हेक्टरसाठी लाभ दिला जाणार आहे. कोरडवाहू अभियानात तळेपिंपळगाव या गावाची निवड केली असून या अंतर्गत कापूस, मूग पिकास पन्नास हेक्टर आणि कापूस, उडीद पिकासाठी ५० हेक्टर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना लाभ दिल्या जाणार आहे. कोरडवाहू क्षेत्र वगळता सर्वांसाठी बी- बियाणे आणि खते या योजनेअंतर्गत दिल्या जातात. कापूस बियाणे लाभार्थी शेतकऱ्यास स्वत: खरेदी करावे लागतात. मागील तीन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या या योजनेमुळे थोडाबहुत धीर आला आहे. मात्र या योजनेसंदर्भात प्रभारी कृषी अधिकारी आर.एम. शिदोरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शासनाचे उपक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना अद्यापपर्यंत कार्यालयास मिळालेल्या नाहीत. वरिष्ठांचे आदेश व सूचनांनुसार सदरील योजना राबविली जाणार आहे, असे त्यांनी यावेळी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याबाबत प्रगतशील शेतकरी पी.एस. पवार म्हणाले की, शासन राबवित असलेल्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वेळेवर बी- बियाणे दिले तरच या योजनेचा उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले.