शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

सिस्टर आमचे पालक, त्यांना कारागृहातून सोडा; विद्यादीप बालगृहातील मुली आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 13:14 IST

बालगृह बंद नका करू म्हणत सायंकाळी गेटवर धिंगाणा, आरडाओरड करत व्यक्त केल्या भावना

छत्रपती संभाजीनगर : विद्यादीप बालगृहाच्या सहायक अधीक्षिका व अन्य सिस्टर आमच्यासाठी पालक आहेत. त्यांची सुटका करा, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत, असे म्हणत बालगृहातील मुलींनी शुक्रवारी सायंकाळी बालगृहातच धिंगाणा घातला. मुख्य गेट, खिडक्या, आतील लाेखंडी ग्रील जोरजोरात वाजवून त्यांनी घोषणाबाजी केल्याने परिसरात काही काळ तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. मात्र, पोलिस, बाल कल्याण समितीने वेळीच धाव घेत त्यांची समजूत घातल्यानंतर मुली शांत झाल्या.

३० जून रोजी याच बालगृहातून नऊ मुली पळून गेल्याच्या घटनेनंतर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. औरंगाबाद खंडपीठासह राष्ट्रीय महिला आयोगाने आदेश दिल्याने पोलिसांनी यात बालगृहाच्या व्यवस्थापन पाहणाऱ्या चार महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात बुधवारी सायंकाळी अधीक्षिका वेलरी भगवान जोसेफ (वय ३१), सिस्टर सुचिता भास्कर गायकवाड (५६), केअर टेकर अलका फकीर साळुंके (४६) यांना अटक करण्यात आली. गुरुवारी न्यायालयाने या तिघींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यांच्या जामिनावर शनिवारी सुनावणी होणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

सायंकाळी नेमके काय घडले ?बालगृहात सध्या जवळपास ८० मुली वास्तव्यास आहेत. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास या मुली अचानक आक्रमक झाल्या. बालगृहातील तीन महिलांना अटकेच्या विरोधात त्यांनी आरडाओरड, घोषणाबाजी करत भावना व्यक्त केल्या. लोखंडी गेट, खिडक्या, बालगृहाचे आतील लोखंडी ग्रील जोरजोरात वाजवणे सुरू केले. आसपासच्या रहिवाशांना नेमके काय झालेय, हे कळत नव्हते. मोठा गोंधळ झाल्याचे कळताच पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक आयुक्त संजय सानप, सहायक निरीक्षक विकेक जाधव, दामिनी पथकाच्या कांचन मिरधे, बाल कल्याण समितीच्या प्रमुख ॲड. आशा शेरखाने-कटके यांनी तत्काळ बालगृहात धाव घेतली.

रात्री ९ वाजेपर्यंत समजूतवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मुलींशी जवळपास अडीच तास चर्चा केली. त्यांना गुन्हा का दाखल झाला, कायद्याच्या व्याख्या, अटक व जामिनाची प्रक्रिया समजून सांगण्यात आली. त्यानंतर त्यांचे सर्व म्हणणे ऐकून त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. मुलींचे बालगृहातील महिला कर्मचाऱ्यांसोबत भावनिक संबंध असल्याने त्या आज व्यक्त झाल्या, त्यांची समजूत घालण्यात आली असून, त्या शांत झाल्याची माहिती पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी सांगितले.

काय होत्या मागण्या ?मुलींनी बालगृहाच्या सिस्टर, सहायक अधीक्षकांच्या अटकेवर तीव्र संताप व्यक्त करत त्यांची सुटका करण्याची मागणी केली. शिवाय, एका महिला वकिलाने त्या नऊ मुलींना पळून जाण्यासाठी, बालगृहाविरोधात बोलण्यासाठी उद्युक्त केल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर