शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

संजय वाघचौरे यांना निवडणूक कठीण

By admin | Updated: July 29, 2014 01:13 IST

रफिक पठाण, जायकवाडी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचे गाजर दाखवून आमदारकी पदरात पाडून घेणाऱ्या आ. संजय वाघचौरे यांनीच या योजनेचा बट्ट्याबोळ केल्याचा आरोप

रफिक पठाण, जायकवाडी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचे गाजर दाखवून आमदारकी पदरात पाडून घेणाऱ्या आ. संजय वाघचौरे यांनीच या योजनेचा बट्ट्याबोळ केल्याचा आरोप होत असून आगामी विधानसभा निवडणुकीत हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.गेल्या साडेचार वर्षांच्या काळात पैठण तालुक्यात बोटावर मोजण्याइतकी विकासाची कामे झाली. काम थोडे आणि गाजावाजाच जास्त, असाच काहीसा प्रकार वाघचौरेच्याबाबतीत होत आहे. विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्याने आ. संजय वाघचौरे यांनी ‘लक्ष्य-२०१४’ या नावाखाली पैठण तालुक्यातील ६० गावांत मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीसाठी दौरा सुरू केला. वाघचौरे यांना अगदी नगण्य प्रतिसाद मिळत असून, उलट नागरिकांच्या प्रश्नांच्या भडीमाराला सामोरे जावे लागत आहे. दौऱ्यात आ. वाघचौरेयापूर्वी झालेल्या विकासकामांचेदुसऱ्यांदा उद्घाटन करीत असल्याने ग्रामस्थही बुचकळ्यात पडले आहेत. २००९ च्या विधानसभेच्या तोंडावर पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या २२२ कोटी रुपये खर्चाच्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन टप्पा क्र. २ ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजुरी देऊन त्याचे उद्घाटन केले. या योजनेच्या मुद्यावर संजय वाघचौरे यांना आमदारकी मिळाली. परंतु गेल्या पावणेपाच वर्षांच्या काळात या योजनेसाठी आ. वाघचौरे यांनी काहीच केले नाही. शेतकऱ्यांच्या शेतात पाईपलाईनसाठी केवळ खड्डे खोदून ठेवले. शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडले नाही.ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन टप्पा क्रमांक २ या योजनेचे जनक खरे तर अप्पासाहेब निर्मळ. अप्पासाहेब निर्मळ यांनी वेळोवेळी आंदोलने व शासनदरबारी पाठपुरावा करून ही योजना मंजूर करून घेतली होती. योजना पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी आ. वाघचौरे पावणेपाच वर्षांत पार पाडता आली नाही. कोणत्याही गावात गेले की आमदार संजय वाघचौरे हे आपण कोट्यवधीचा निधी आणून तालुक्याचा विकास केला असा डांगोरा पिटतात, मात्र हा निधी कोठे खर्च केला, असा सवाल विरोधक करीत आहेत. पण आ. वाघचौरे यांच्याकडे त्याचे सडेतोड उत्तर नाही. पैठणचे प्राधिकरणही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची देण आहे. आ. वाघचौरे यांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारू नयेत, असे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. बिडकीन परिसरातील डीएमआयसी हा प्रकल्प केंद्राचा आहे; परंतु वाघचौरे त्याचेही श्रेय लाटण्याचा प्रयत्न चालविला आहे.वाघचौरे यांना आमदारकी मिळताच त्यांच्या स्वभावात मोठा बदल झाला. त्यांच्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले, अशा कार्यकर्त्यांना त्यांनी सर्वांत अगोदर बाजूला फेकले. गाडीच्या काचा लावून प्रवास करणारे आमदार एक महिन्यापूर्वी जमिनीवर आले. आता त्यांना मतदार आठवू लागले आहेत. केवळ नातेवाईकांना सोबत ठेवून निवडणुका जिंकता येत नाहीत, हे त्यांना संत एकनाथ साखर कारखाना, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासारख्या निवडणुकीत कळलेच आहे. या निवडणुकीत त्यांना सपाटून मार खावा लागला. विधानसभा निवडणुकीत हाच अनुभव आल्यास आश्चर्य वाटू नये. स्वपक्षातून घेरण्याची तयारी सुरू झाली आहे.औद्योगिक वसाहतीचा मुद्दाही गाजणारआमदार संजय वाघचौरे यांनी गेल्या पावणेपाच वर्षांच्या काळात कोणतेही असे ठोस विकासाचे काम केलेले दिसून येत नाही; उलट पैठण- औरंगाबाद रस्ता, अनेक मोठ्या गावांतील रखडलेल्या पाणीपुरवठा योजना, अपुऱ्या आरोग्य सुविधा, ग्रामीण भागातील खराब रस्ते, बंद पडलेली ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना व अखेरची घटका मोजत असलेल्या पैठणच्या औद्योगिक वसाहतीला न मिळालेली चालना, हे मुद्दे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आमदार संजय वाघचौरे यांना अडचणीचे ठरणार आहेत.