शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांना प्रशासनाचे अभय

By admin | Updated: November 16, 2015 00:40 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड वाळूपट्टा असलेल्या गेवराई, माजलगाव या तालुक्यांमध्ये बेसुमार वाळू उपसा होत आहे. शासनाने वाळू लिलावच केलेला नसतानाही चोरट्या मार्गाने वाळू नेली जात आहे.

व्यंकटेश वैष्णव , बीडवाळूपट्टा असलेल्या गेवराई, माजलगाव या तालुक्यांमध्ये बेसुमार वाळू उपसा होत आहे. शासनाने वाळू लिलावच केलेला नसतानाही चोरट्या मार्गाने वाळू नेली जात आहे. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. वाळू माफियांना प्रशासनाचेच अभय मिळत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात एकूण १२ ठिकाणी वाळू पट्टे आहेत. पर्यावरणाला होत असलेला धोका लक्षात घेवून शासनाने वाळूचे ठेके पूर्णत: रद्द केलेले आहेत. प्रशासनाच्या ‘रेकॉर्ड’नुसार एकाही ठिकाणावरून वाळू उपसा होत नाही. मात्र, प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर ट्रकांद्वारे रात्रंदिवस वाळू उपसा सुरू आहे. यांची संबंधित तहसिलदारांना कल्पना आहे. याबाबत अनेक तक्रारी देखील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेल्या आहेत. असे असताना देखील प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.गेवराईत एक महिन्यात केवळतीन वाहनांवर कारवाईएकट्या गेवराई तालुक्यात ८०० ते ९०० ट्रक, ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक केली जाते. केवळ रात्रीच वाळू चोरी होते असे नाही तर दिवसा देखील वाळू अवैधरित्या उचलली जाते. असे असताना मागील एक महिन्यात केवळ तीन वाहनांवर गेवराई प्रशासनाने कारवाई केली असल्याचे प्रभारी तहसिलदार वैजीनाथ जोशी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.माजलगावात कारवाईकडे पाठकेवळ माजलगाव तालुक्यातून १५० च्या जवळपास ट्रक व ट्रॅक्टर वाळू उपसा करतात. रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळूच्या ट्रक सूरू आहेत. या संदर्भात कारवाई केवळ ४ वाळू ट्रकवर केली आहे. दीडशेच्या वर ट्रक असताना केवळ चारच गाड्यांवर कारवाई झाली आहे.वाळू उपसा बंद करायंत्राद्वारे वाळू उपसा केला जात आहे. एवढेच नाही तर माजलगाव व गेवराई तालुक्यात शेकडो ट्रक वाळूचा साठा केला जात आहे. असे असताना देखील कारवाई होत नाही. वाळू माफियांवर कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनविसेचे बाळासाहेब डुकरे यांनी दिला आहे.ठेकेदार मोकाट, ट्रकवाल्यांवर बडगाअवैध वाळू उपशावर कारवाईचा देखावा करीत प्रशासनाकडून केवळ ट्रकचालकांना वेठीस धरले जाते. ठेकेदारांवर मात्र कारवाई होत नाही. त्यामुळे ठेकेदारांना पाठीशी घालून ट्रकवाल्यांवरच अवैध वाळू वाहतूक केल्याचा ठपका ठेवला जातो. ट्रक चालकांना पोलीस, आरटीओ, महसूल प्रशासन अशा सर्वांना तोंड द्यावे लागते.गोदावरी नदीपात्राभोवतीच मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा केला जात आहे. हा प्रकार प्रशासनातील अधिकारी उघड्या डोळ्याने पहातात. मात्र, आतापर्यंत एकाही साठेबाजांवर जिल्हा प्रशासनाने अथवा संबंधित तहसिलदाराने कारवाई केलेली नाही. यामुळे साठेबाज मोकाट सुटत आहेत.यंत्राद्वारे नदीपात्रातील वाळू उपसा केला जात आहे. यामुळे नदी पात्रातील पाणीपातळी देखील मोठ्या प्रमाणात खालावत चालली आहे. अगोदरच जिल्हयात दुष्काळी परिस्थिती आहे. यातच वाळू उपशामुळे गेवराई, माजलगावच्या वाळूपट्टयातील पातळी खालावत चालली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे.