शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

विकासाचा संकल्प-२0१५

By admin | Updated: November 15, 2014 23:54 IST

हिंगोली : हिंगोली जिल्ह्याच्या विकासाचा संकल्प करताना सर्वच लोकप्रतिनिधींनी पक्षाचे जोडे काढून एकसंघपणे काम करण्याची ग्वाही पत्रकार संघातर्फे आयोजित कार्यक्रमात दिली.

हिंगोली : हिंगोली जिल्ह्याच्या विकासाचा संकल्प करताना सर्वच लोकप्रतिनिधींनी पक्षाचे जोडे काढून एकसंघपणे काम करण्याची ग्वाही पत्रकार संघातर्फे आयोजित कार्यक्रमात दिली. तर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनीही नवनिर्वाचितांना विकासाच्या टिप्स दिल्या.या कार्यक्रमास गुजराथी यांच्यासह खा.राजीव सातव, आ.तानाजी मुटकुळे, आ.संतोष टारफे, आ.रामराव वडकुते, जिल्हाधिकारी राम गगराणी, मुख्य कार्यकारी अधिकारी पोपटराव बनसोडे, नगराध्यक्षा अनिता सूर्यतळ, यास्मिनबेगम, भगवान कुदाळे, पं.स.सभापती महानंदा लोणे, सीताबाई राठोड, जि.प.सदस्य ओमप्रकाश देशमुख, शिवाजी मस्के आदींची उपस्थिती होती.प्रारंभी सभागृहात उपस्थितांनी जिल्ह्यातील क्रीडा, उद्योग, सिंचन, शिक्षण, दळणवळण आदी क्षेत्राशी संबंधित प्रश्न मांडले. प्रास्ताविक नंदकिशोर तोष्णीवाल यांनी केले. त्यानंतर बोलताना नगराध्यक्षा सूर्यतळ म्हणाल्या, शहरातील रस्ते व पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. तर आ.टारफे म्हणाले, पक्षभेद विसरून आम्ही जिल्हा विकासासाठी एकत्र येऊ. रस्त्याचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आ.मुटकुळे म्हणाले, सिंचनाचा प्रश्न हा प्राधान्याचा विषय आहे. येत्या वर्षभरात तो मार्गी लावण्याचा प्रयत्न राहिल. पक्षभेद विसरून त्यासाठी काम करावे लागणार आहे. याशिवाय हिंगोली शहराच्या विकासासाठी पालिकेने पुढाकार घेतल्यास मदतीसाठी तयार आह, असेही मुटकुळे यांनी सांगितले.त्यानंतर आ.वडकुते यांनीही सिंचनाच्याच मुद्याला हात घातला. तसेच वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले. खा.राजीव सातव यांनी चांगली माणसे राजकारणात आली पाहिजे, टिकली पाहिजे, असे सांगितले. तर मागील निवडणुकीत ‘गांधी’ची चलती असल्याच्या अनुभवावर चिंता व्यक्त केली. कन्हेरगाव-नांदेड रस्त्याचे काम एका वर्षानंतर सुरू होईल. सध्या दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. यासाठी दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याशी तीनदा भेटल्याचेही ते म्हणाले. रेल्वे, पोस्ट, दूरसंचार या प्रश्नांबाबत त्यांनी घेतलेल्या पाठपुराव्यामुळे आगामी वर्ष, दोन वर्षांत ही कामे मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर बँकांचे जाळे, लघुउद्योग, अद्ययावत क्रीडासंकुलांसाठी पुढाकार घेण्याची ग्वाही दिली.यावेळी जिल्हाधिकारी गगराणी व मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोडे यांचेही भाषण झाले. सूत्रसंचालन वसंतकुमार भट्ट यांनी केले.