शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

आंबेडकरवादाचा नवा आयाम रुजवा, बाबासाहेबांना अधिक व्यापक करा : बाळासाहेब आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 1:31 PM

‘सामूहिक जीवनाचा’ आंबेडकरवादाचा नवा आयाम रुजवा, बाबासाहेब अधिक व्यापक करा’, असे आवाहन भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.

ठळक मुद्दे‘बाबासाहेबांचा राष्ट्रवाद’ या मुद्यापासून बाळासाहेबांनी आपली मांडणी सुरू केली. आरएसएस सांस्कृतिक राष्ट्रवादाची भाषा करतो; पण याबाबतची मांडणी त्यांच्याकडे नाही.

औरंगाबाद : ‘सामूहिक जीवनाचा’ आंबेडकरवादाचा नवा आयाम रुजवा, बाबासाहेब अधिक व्यापक करा’, असे आवाहन भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. अनुसूचित जाती, जमाती व बौद्ध आयुर्विमा कर्मचारी कल्याण संघटनेच्या वतीने रविवारी ( दि. ८ ) आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे औरंगाबाद विभागीय अध्यक्ष अशोकराव कुशेर होते. 

‘बाबासाहेबांचा राष्ट्रवाद’ या मुद्यापासून बाळासाहेबांनी आपली मांडणी सुरू केली. आरएसएस सांस्कृतिक राष्ट्रवादाची भाषा करतो; पण याबाबतची मांडणी त्यांच्याकडे नाही. केवळ या शब्दाचा वापर ते करतात. संस्कृती वेगवेगळी असेल तर त्यातून आपुलकीची भावना जोपासली जात नाही. आंबेडकरवादाचा आढावा घेताना आपण महात्मा गांधी यांच्याजवळ येऊन अटकतो, असे सांगत गांधी-आंबेडकर यांच्यातील वैचारिक मतभेदांसह काही साम्यस्थळेही त्यांनी दाखवली. 

उमेदवार हा प्रतिनिधी असतोबाळासाहेबांच्या आधी अध्यक्षीय समारोप करताना अशोकराव कुशेर यांनी सांगितले होते की, आगामी निवडणुकांमध्ये ंिजंकणारा उमेदवार द्या. हा धागा पकडत बाळासाहेब म्हणाले, उमेदवार जिंकणारा नसतोच. त्याला जिंकून देणारा विचार प्रवाह असतो. या प्रवाहानेच हे ठरवण्याची गरज असते. यापुढे व्यक्तिगत जीवनाचा फंडा नको. सामूहिक जीवनाचा फंडा विकसित करण्याची गरज आहे आणि सामाजिक लोकशाहीबरोबरच कौटुंबिक लोकशाहीही रुजवली गेली पाहिजे. 

भीमा-कोरेगाव दंगलीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब काय बोलतात या  उत्सुकतेपोटी भानुदास चव्हाण सभागृहात मोठी गर्दी झाली होती. अत्यंत शांततेत त्यांचे भाषण उपस्थित सारेच जण ऐकत होते. प्रारंभी, संघटनेचे सरचिटणीस टी.डी. काकडे यांनी प्रास्ताविक केले. ११७ व्या घटना दुरुस्तीवर इतर नेते कुणी बोलत नाहीत. बाळासाहेबांचं त्यावर चिंतन आहे, याकडे भीमराव सरवदे यांनी लक्ष वेधले. प्रारंभी, बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून बाळासाहेबांनी दीपप्रज्वलन केले. संध्या पंडागळे यांनी सूत्रसंचालन केले, तर नंदकुमार सोनवणे यांनी आभार मानले.

‘आठवणींचे पक्षी ’आवडते आत्मकथन‘दलित पँथर चळवळीच्या काळात अनेक आत्मकथने आली. त्यातील प्र. ई. सोनकांबळे यांचे ‘आठवणीचे पक्षी’ हे माझे आवडते आत्मकथन. बाकीचे आत्मकथन मला कृत्रिम वाटतात. ओढूनताणून लिहिलेली वाटतात’ असा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला. ते म्हणाले, व्यक्तीची प्रगती हा फंडा पँथरच्या काळात होता. तो आवश्यकही होता. त्यातूनच आत्मकथन आले. यावेळी प्रबुद्ध भारत या नावाने संघटनेतर्फे तीन लाखांच्या धनादेशाचा व ओबीसी संघटनेतर्फे २५ हजारांच्या मदतीचा स्वीकार आंबेडकर यांनी केला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरdr. babasaheb ambedkar birthday celebrationडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीSocialसामाजिकPoliticsराजकारण