शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रोगप्रतिकार शक्तीसाठी 'बूस्टर डोस' ठरणाऱ्या रानभाज्या बहरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 19:56 IST

अनेक जीवनसत्व असलेल्या रानभाज्या खाण्याकडे नागरिकांचा कल वाढला

ठळक मुद्देनैसर्गिकरीत्या येणाऱ्या भाज्या कीटकनाशक मुक्त आहेतरोगप्रतिकारक शक्ती वाढी सोबतच अनेक व्याधींवर गुणकारी

- श्यामकुमार पुरे

सिल्लोड: अजिंठ्याच्या डोंगरात रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या रानभाज्या बहरल्या आहेत. अनेक जीवनसत्व असलेल्या या भाज्या खाण्याकडे आता लोकांचा कल वाढला आहे. कोणतीही औषधी फवारणी न करता नैसर्गिकरित्या डोंगरात, शेताच्या बांधावर उगवलेल्या या रानभाज्यांची खेड्यापाड्यातील ग्रामस्थांना चांगलीच ओळख आहे. या भाज्यांवर ताव मारण्यासोबतच ते या नैसर्गिक देणगीचे जतन करताना ही दिसत आहेत. 

अजिंठयाच्या कुशीत पावसाळ्यात अनेक रानभाज्या सर्वत्र उगवतात. श्रावणात तर या भाज्यांना बहर येतो. अजिंठा डोंगर रांगालगतचा भाग याबाबत अधिक समृद्ध आहे. पिपळदरी, हळदा, लेनापुर, वसई या भागात मोठ्याप्रमाणावर रानभाज्या आढळतात. त्यात चिंचु, कोलार, माठ, म्हैसवेल, हत्तीकान(ब्रम्हराक्षस) भांगरा, करटूले, कोका, मुरमुट्या, गुल चांदणी, फांद, अंबाडी, कुरडू, आघाडा, तांदुळजा, बांबचे कोंब, शतावरी, राजगिरा, तरोटा, घोळ अशा जवळपास 20 प्रकारच्या रानभाज्या सहज दिसून येतात. विशेष म्हणजे या भाज्या नैसर्गिकरित्या येत असून यावर कसल्याही प्रकारची कीटकनाशक फवारणी करण्यात येत नाही. यामुळेच अत्यंत पौष्टिक असण्यासोबतच या भाज्या सकसही आहेत. 

रानभाज्या व त्याचे महत्व1) तांदुळजा :- 'क' व 'अ' जीवनसत्व विपुल असून रोगप्रतिकार शक्ती वाढीसाठी उपयुक्त. उष्णता व दाह कमी करते, मलावरोध दूर करते. 2) फांद :- ही वेल वर्गीय असून याची पाने खाद्य असतात. पित्तविकार दूर करणारी, निद्रा येण्यासाठी उपयुक्त3) अंबाडी :- 'क' व 'अ' जीवनसत्व, लोह, झिंक, कैल्शियम यात विपुल प्रमाणात असतात. गुणाने असून रोगप्रतिकार शक्ती वाढवते. ४) म्हैसवेल :- 'अ' जीवनसत्व वाढवणारी, पोटाच्या विकारात लाभदायी 5) हत्ती कान :- यास ब्रम्हराक्षस म्हणुन ही ओळखले जाते. खुप दुर्मिळ असणाऱ्या या वनस्पतिचे शास्त्रीय नाव "लिया मैक्रोफायला " असे आहे. पित्तविकार दूर करणारी, पाचकता वाढविणारी.

 

6) कोलार :- रुचकर व मल स्वछ करणारी ,मुळव्याधीसाठी लाभदायक.7) आघाडा :-  गुणाने कडू, पाचक, उष्णता कमी करणारी, मूत्रातील आम्लता कमी करणारी.8) घोळ :- थंड गुणांची, पचनास मदत करणारी. 9) चिंचु :- ही दुर्मिळ असणारी वनस्पति असून याच्या पानांची भाजी बनवतात. रुचकर, पचनास हलकी व जीवनसत्व व खनिजयुक्त आहे.10) कुरडू :-  शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. दमा व श्वास रोगत लाभदायी.  

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादvegetableभाज्याHealthआरोग्य