शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरु होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 11:06 IST

लाभक्षेत्रातील शेतकरी आनंदी : २० वर्षांपासून बंद पडलेल्या योजनेला संजीवनी

वैजापूर : तालुक्यातील दहेगाव येथील बंद पडलेली रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना सुरु करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी ५ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मंजूर केला आहे. त्यामुळे मागील २० वर्षांपासून बंद असलेल्या या योजनेला संजीवनी मिळाली असून योजनेच्या पुनर्जीवनाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी आनंदी झाले आहेत.

गोदावरीच्या बँक वॉटरचा वापर करुन तालुक्यातील गावांना सिंचनाचा फायदा व्हावा, या उद्देशाने माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांच्या पुढाकारातून रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेमुळे तालुक्यातील २३ गावांतील १७०० एकर जमीन तसेच गंगापूर तालुक्यातील काही गावांना सिंचनाचा फायदा मिळणार होता. पण कर्जाच्या बोजामुळे ही योजना बंद पडली. या योजनेसाठी सहकारी संस्थेने जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ३७ कोटी रुपयांचे कर्ज घेतले असून ही रक्कम व्याजासह १३० कोटी रुपये झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक ६५ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यास तयार असून उर्वरित कर्ज शासनाने माफ करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकºयांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा असल्याने इतर बँका या शेतकºयांना कर्ज देत नसल्याने या भागातील शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. रामकृष्ण गोदावरी योजनेचा वापर फक्त निवडणुकीचा मुद्दा म्हणून केला गेला. प्रत्यक्षात ही योजना सुरु करण्यासाठी लोकप्रतिनिधींना अपयश आले, असा आरोप होत होता. रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना कृती समितीचे अध्यक्ष जे.के. जाधव यांनी गेल्या वर्षी कनकसागज, टाकळीसागज या भागातील शेतकºयांना सोबत घेऊन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची औरंगाबाद येथे भेट घेऊन योजना सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यावेळी बागडे यांनी योजना सुरु करण्यासाठी अनुकुल प्रतिसाद दिला होता. त्यानंतर योजनेतील पंपिग मशीन, पाईपलाईन, व्हॉल्व्ह व इतर नादुरुस्त मशिनरी सुरु करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आले होते. मागील वर्षी मे महिन्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील बंद पडलेल्या सिंचन योजना सुरु करण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याअनुषंगाने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने हिरवा कंदिल दाखविला असून पाच कोटी ७१ लाख रुपयांचा निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मंजूर केला आहे.

वैजापूर व गंगापूर तालुक्यातील ३८ गावांना फायदावैजापूर व गंगापूर तालुक्यातील ३८ गावांना सिंचनाचा मोठा फायदा मिळणार आहे. ही योजना सुरु झाल्यास ग्रामीण भागासह वैजापूर शहर, नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील जांबरगाव व रोटेगाव येथील औद्योगिक वसाहतीला पाणी मिळणार आहे.

घोटाळ्यामुळे १९९९मध्ये योजना डबघाईस१९९०-९१ या वर्षात या महत्त्वाकांक्षी योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. गोदावरी नदीतील कायगाव टोका येथून जायकवाडी धरणाच्या फुगवट्यातील पाणी वैजापूर तालुक्यात भूमिगत पाईपलाईनद्वारे आणण्याच्या या योजनेस १९९१ मध्येच यशही आले. मात्र, ही योजना जास्त काळ टिकली नाही. व्यवस्थापनाचे ढिसाळ नियोजन व आर्थिक घोटाळ्यामुळे १९९९ ला योजना डबघाईस येऊन बंद पडली. यामुळे हजारो शेतकºयांच्या बागायती शेती करण्याच्या स्वप्नाला तडा गेला. याशिवाय योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी सभासदांच्या जमिनीवर जिल्हा बँकेच्या कर्जाचा डोंगर उभा राहिल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते.

मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांचे सहकार्यअनेक वर्षांपासून बंद असलेली रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना सुरु करण्यासाठी वीस वर्षात काँग्रेस सरकारकडे पाठपुरावा करूनही या सरकारकडून केवळ आश्वासनाचे गाजरच मिळाले. त्यामुळे येथील शेतकºयांची अवस्था वाईट झाली. याउलट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या प्रयत्नांमुळे ही योजना सुरु होत आहे, असे माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीgodavariगोदावरीriverनदी