शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
9
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
10
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
11
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
12
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
13
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
14
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
15
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
16
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
17
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
18
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
19
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
20
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
Daily Top 2Weekly Top 5

राजूरला महिलांचा पाण्यासाठी हंडा मोर्चा

By admin | Updated: June 27, 2014 00:13 IST

राजूर : गेल्या महिनाभरापासून पाण्यापासून वंचित असलेल्या त्रस्त महिलांनी गुरूवारी राजूर येथील ग्रामपंचातवर हंडा मोर्चा काढून सुरळीत पाणी पुरवठयाची मागणी केली.

राजूर : गेल्या महिनाभरापासून पाण्यापासून वंचित असलेल्या त्रस्त महिलांनी गुरूवारी राजूर येथील ग्रामपंचातवर हंडा मोर्चा काढून सुरळीत पाणी पुरवठयाची मागणी केली. यावर सरपंच शिवाजीराव पुंगळे यांनी येत्या दोन दिवसांत सुरळीत पाणी पुरवठा करू, असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.राजूर येथील बसस्थानका समोरील वार्ड क्रमांक १ मधील रहिवाशांना गेल्या महिनाभरापासून पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले होते. अलिकडे राजूरात भीषण पाणी समस्या निर्माण झाल्याने खासगी टँकर चालकांनी पाण्याचे दर वाढवले आहेत. या भागात बहुतांशी नागरिक मजूरी करून उदरनिर्वाह भागवतात, त्यांना विकतचे पाणी घेणे परवडत नाही. त्यातच ग्रामपंचायतच्या चुकीच्या नियोजनामुळे या भागात गेल्या महिनाभरापासून पाणी पुरवठा बंद आहे. सध्या पावसाळा असूनही कडक ऊन आहे. भर उन्हात महिलांना हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागते. त्रस्त महिलांनी आज अचानक ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. संतप्त महिलांनी गावाता पाणीपुरवठा होत असतांना आमच्यावरच अन्याय का? असा प्रश्न उपस्थित करून ग्रामपंचायतचे पदाधिकारी दुजाभाव करीत असल्याचा आरोप केला. यावेळी सरपंच शिवाजीराव पुंगळे यांना निवेदन देण्यात आले. सरपंच शिवाजीराव पुंगळे यांनी विहीरीतून पाण्याचा दाब कमी झाल्याने पाणीपुरवठा करणे शक्य झाले नाही, आता येत्या दोन दिवसांत या वार्डात आपण जातीने लक्ष घालून सुरळीत पाणीपुरवठा करू, असे आश्वासन दिल्याने महिलांनी आंदोलन मागे घेतले. (वार्ताहर)भटकंती कायमदरम्यान, पावसाळ्याच्या तोंडावर नियमित पाणीपुरवठा होत नसल्यामुळे गावातील आबालवृद्धांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.