शहरं
Join us  
Trending Stories
1
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
2
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
3
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
4
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
5
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
6
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
7
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
8
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
9
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
10
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
11
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
12
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
13
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
14
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
15
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
16
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
17
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
18
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
19
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
20
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

परळीत रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

By admin | Updated: May 10, 2014 23:50 IST

संजय खाकरे ल्ल परळी साईनगर- शिर्डी - काकीनाडा एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये धुमाकूळ घालून दरोडेखोरांनी महिला प्रवाशांच्या गळ्यातील दागिने लुटले होते़

संजय खाकरे ल्ल परळी साईनगर- शिर्डी - काकीनाडा एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये धुमाकूळ घालून दरोडेखोरांनी महिला प्रवाशांच्या गळ्यातील दागिने लुटले होते़ या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ अपुरा बंदोबस्त असल्याने महिलांची सुरक्षितता धोक्यात तर आलीच आहे, शिवाय चोर्‍याही वाढल्या आहेत़ बीड जिल्ह्यात एकमेव परळी शहरातून रेल्वे गेलेली आहे़ परळीतील प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरात परराज्यातील भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात़ महत्त्वाचे म्हणजे परळीतील औष्णिक विद्युत केंद्रामुळे येथील रेल्वेस्थानक कायम गजबजलेले असते़ या रेल्वेस्थानकातून आंध्र प्रदेश, कर्नाटकात रेल्वेगाड्या सुटतात़ परळीच्या रेल्वेस्थानकावर आधुनिक सोयी- सुविधा पुरविण्याचे प्रयत्न होत असताना प्रवाशांच्या सुरक्षेबाबत मात्र रेल्वे प्रशासन गांभिर्याने पहावयास तसार नाही, असे दिसते़ स्थानकातील पोलिस चौकीला अवकळा प्राप्त झाली आहे़ चौकीचे प्रभारी सुटीवर आहेत़ अपुर्‍या कर्मचार्‍यांवरच प्रवाशांची सुरक्षा निभावली जाते़ रात्रीच्या वेळी तर स्थानकाला कोणी वाली आहे की नाही, अशी बिकट स्थिती असते़ परळी- परभणी व परळी- उदगीर या रेल्वेगाड्यातून प्रवाशांना जीव मुठीत धरुनच प्रवास करावा लागतो़ रात्री- अपरात्री प्रवासाच्या नावाखाली चोर व दरोडेखोरांचा सर्रास वावर असतो, हे आता लपून राहिलेले नाही़ त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने गांभिर्याने पाहण्याची गरज आहे़ अन्यथा चोर व दरोडेखोरांच्या भीतीने लोक रेल्वे प्रवास करणार नाहीत, असे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष जी़ एस़ सौंदळे यांनी सांगितले़ अतिक्रमणाचा विळखा रेल्वेस्थानक परिसरात अतिक्रमण वाढले आहे़ प्रवेशद्वारावरच फळविक्रेते ठाण मांडून असतात़ ज्यूस सेंटर, आॅटोरिक्षा, दुचाकी वाहने यामुळे रस्ता अपुरा पडत आहे़ अतिक्रमण हटविण्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप व्यापारी गोवर्धन चाटे यांनी केला़ प्रवाशांनी घाबरू नये अपुरा स्टाफ आहे हे मान्य आहे; परंतु प्रवाशांनी घाबरुन जाऊ नय़े़ आवश्यकतेनुसार जादा फौजफाटा तैनात करण्यात येतो, असे शहर ठाण्याचे निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी सांगितले़ रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी परळीपासून परभणीपर्यंत व पुढे बिदरपर्यंत तैनात असतात़ त्यामुळे प्रवाशांनी घाबरुन न जाता सुरक्षितरीत्या प्रवास करावा, असे आवाहन निरीक्षक गायकवाड यांनी केले़