शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
3
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
4
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
5
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
6
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
7
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
8
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
9
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
10
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
11
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
12
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
13
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
14
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
15
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
17
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
18
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
19
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
20
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
Daily Top 2Weekly Top 5

वेरूळ महोत्सवाचा उद्देशच हरपला

By admin | Updated: November 7, 2014 00:52 IST

औरंगाबाद : महोत्सव घेण्याची ख्याती असलेल्या राज्य पर्यटन महामंडळाला पर्यटन राजधानीतच वेरूळ अजिंठा महोत्सवातील सातत्य राखण्यात अपयश आले आहे.

औरंगाबाद : महोत्सव घेण्याची ख्याती असलेल्या राज्य पर्यटन महामंडळाला पर्यटन राजधानीतच वेरूळ अजिंठा महोत्सवातील सातत्य राखण्यात अपयश आले आहे. पर्यटनवाढीचा मुख्य उद्देश असलेल्या महोत्सवाचा पर्यटनवाढीच्या दृष्टीने कोणताही विचार न झाल्यामुळे, तसेच एकेकाळी पर्यटनाच्या जागतिक नकाशावर पोहोचलेला हा महोत्सव सरकारी अनास्थेच्या कचाट्यात सापडला आहे. सुमारे तीस वर्षांपूर्वी जगप्रसिद्ध वेरूळ लेण्याच्या नावाने सुरू झालेल्या या महोत्सवाचा मुख्य उद्देश पर्यटनवृद्धी असाच होता, अशी माहिती या महोत्सवाशी सुरुवातीपासून संबंधित असलेल्या पर्यटन आणि इतिहासाचे अभ्यासक रफत कुरेशी यांनी सांगितले. मात्र, या उद्देशात आपण तीस वर्षांनंतरही सफ ल झालो असे म्हणता येत नाही. हे आपल्या पर्यटन राजधानीचे दुर्दैव म्हणावे लागेल. मागील वर्षी महोत्सव का झाला नाही, हे कळलेच नाही. यंदा मोठ्या कलावंतांच्या तारखा मिळणे अवघड आहे. त्यामुळे हा महोत्सव होणे कठीण दिसत आहे. इतिहासाच्या अभ्यासक डॉ. दुलारी कुरेशी म्हणतात की, ज्या उद्देशाने हा महोत्सव सुरू झाला त्याचा उद्देश सफल व्हायला पाहिजे. परदेशी पर्यटक, तसेच महाराष्ट्रासह इतर राज्यांतून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढावी, असा उद्देश होता. वेरूळ येथे होत असलेला महोत्सव गैरसोयीचा ठरत होता म्हणून हा महोत्सव औरंगाबादेत आणण्यात आला. सुरुवातीला साधारणत: तीस लाख रुपयांमध्ये हा महोत्सव होत असे. काही उद्योजकही पुढे आले त्यामुळे ते सुसह्य बनले. देश- विदेशातील कलावंत येथे येतात त्यांची कला पाहायची संधी यानिमित्ताने मिळते. मुळात वेरूळ येथून हा महोत्सव औरंगाबादेत आणल्यानंतर व्ही. राधा जिल्हाधिकारी असताना तो तीन वर्षे सतत चालला. नंतर पुन्हा मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या हल्ल्यामुळे हा महोत्सव खंडित झाला. २०१२ साली तो पुन्हा सुरू झाला. मात्र, तो एका वर्षापुरताच. पुण्यात सवाई गंधर्व महोत्सव ज्या उत्साहाने आणि शिस्तीने अखंडितपणे चालू आहे. त्याच धर्तीवर हा महोत्सव चालू राहायला पाहिजे, अशी शहरातील कलावंतांची अपेक्षा आहे.