आॅगस्टपर्यंत पुरेल एवढाच चारा

By Admin | Updated: April 23, 2016 23:54 IST2016-04-23T23:51:05+5:302016-04-23T23:54:01+5:30

हिंगोली : खरीप हंगामात सोयाबीन, तुरीचे कुटार, ज्वारी, कडबा, गवत शेतकऱ्यांनी कापून ठेवल्यामुळे काही प्रमाणात चारा मिळाला.

Providing enough food till August | आॅगस्टपर्यंत पुरेल एवढाच चारा

आॅगस्टपर्यंत पुरेल एवढाच चारा

हिंगोली :खरीप हंगामात सोयाबीन, तुरीचे कुटार, ज्वारी, कडबा, गवत शेतकऱ्यांनी कापून ठेवल्यामुळे काही प्रमाणात चारा मिळाला. तर जिल्हा कृषी विभागाच्या वतीने विविध गावांत शेतकऱ्यांना चारा निर्मितीसाठी मोफत बियाणे वाटप केले होते. त्यानुसार सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर आॅगस्टपर्यंत पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात लहान ५७ हजार १५२, मोठी २.८३ लाख जनावरे आहेत. तर शेळ्या १.१२ लाख, मेंढ्या ६0२४ आहेत. तर २0१५-१६ मधील खरीप व रबी हंगामापासून ५.८२ लाख मे. टन चाऱ्याचे उत्पादन झाले आहे. या जनावरांना प्रतिदिन १९४५ मे. टन एवढा चारा लागतो. एक महिन्यासाठी ५८ हजार ३६९ चाऱ्याची गरज आहे. मात्र त्या तुलनेत पुढील आॅगस्टपर्यंत चारा पुरेल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. यात सेनगावात १९२, हिंगोलीत १४५, औंढा तालुक्यात २५८, कळमनुरीत १३0 तर वसमत तालुक्यात ४११ दिवस पुरेल एवढा चारा असल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे.
एकंदरीत कृषी विभागाच्या अहवालानुसार तरी चाराटंचाईचे चित्र दिसून येत नाही. त्याचा परिणाम म्हणून अद्याप जिल्ह्यात एकाही गावात चारा छावणी सुरू झाली नाही. परंतु यातील काही गावांत मात्र पाणीटंचाईचे मोठे संकट असल्याने, कृषी विभागाला अपेक्षित चारा मिळणे अवघड आहे. कृषी विभागाने वाटप केलेले मका बियाणे १०० हेक्टरवर पेरणी केल्याने काही प्रमाणात गुरांना ओला चारा मिळण्यास मदत होईल.

Web Title: Providing enough food till August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.