शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

श्रेयवादात राजकीय सौजन्याची ऐशीतैशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2016 23:48 IST

जालना शहर वा जिल्ह्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवत लोकप्रतिनिधींनी एकत्र येणे हे त्या भागाच्या भवितव्यासाठी चांगलेच असते.

राजेश भिसे जालनाशहर वा जिल्ह्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवत लोकप्रतिनिधींनी एकत्र येणे हे त्या भागाच्या भवितव्यासाठी चांगलेच असते. पण केलेल्या विकास कामांवरुन राजकीय सौजन्याची ऐशीतैशी करीत इतरांचा ‘बाप’ काढणे कुठल्या राजकीय संस्कृतीत बसते, हाच खरा सवाल आहे. राजकीय शिष्टाचार पाळून लोकप्रतिनिधींनी जनमानसात आपली प्रतिमा ठेवावी, हाच शिरस्ता राजकारणात राहिलेला आहे. याला जालन्यात माजी आमदाराने छेद दिल्याने राजकीय ‘संस्कृतीचे’ चांगलेच प्रदर्शन झाले, हे मात्र खरे!जालना नगर पालिका कार्यक्षेत्रात येणाऱ्या चंदनझिरा भागात वैशिष्ट्यपूर्ण निधीतून विविध विकास कामे करण्यात आलेली आहेत. केंद्र आणि राज्यात भाजपा व शिवसेनेची सत्ता आहे. तर जालना नगर पालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. आतापर्यंत सत्ता संघर्षामुळेच शहर विकासापासून कोसो दूर राहिले आहे, हे नाकारुन चालणार नाही. पक्षीय मतभेद बाजूला ठेवत भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी गत वर्षांत शहरातील विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणला. याच निधीतून अनेक विकास कामे पूर्ण झाली आहेत. सार्वजनिक ठिकाणी राजकीय सभ्यता आणि शिष्टाचाराचे सर्वांनीच पालन करणे अपेक्षित आहे. पण भाजपाने काही दिवसांपूर्वी रस्ते काँक्रिटीकरणाचे उद्घाटन पक्षीय पातळीवर केले. यात शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या नगराध्यक्षा व शहराच्या स्थानिक आमदारांना डावलण्यात आले. यातूनच वादाची ठिणगी पडली. दुसरा प्रकार चंदनझिरा भागात विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने घडला. काँग्रेस आणि भाजपाने विकास कामांचे स्वतंत्र उद्घाटने केली. यातूनच राजकीय संघर्षाने सर्वोच्च बिंदू गाठला. शहरातील माजी आमदाराने राज्यस्तरीय नेत्यावर टिका करताना खालची पातळी गाठल्याने राजकीय शिष्टाचाराचे धिंडवडे निघाले. आगामी काळात दोन्ही राजकीय पक्षांतील नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष तीव्र होईल, अशी शक्यता सद्यस्थितीवरुन दिसून येते आहे. राजकारणात कुणी कायमचा मित्र वा शत्रू नसतो, हे खरे असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत राजकीय संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. राजकीय ‘सभ्याचार’ पाळूनच लोकप्रतिनिधींनी टीका करावी हीच अपेक्षा नागरिक बाळगून आहेत.