शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची भूमिका संशयास्पद

By admin | Updated: May 9, 2014 00:33 IST

नांदेड : हदगाव येथील दिलीप नवघरे (वय ३२) यांनी पत्नीच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला उद्या १० मे रोजीे एक महिना पूर्ण होत आहे.

 नांदेड : हदगाव येथील दिलीप नवघरे (वय ३२) यांनी पत्नीच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला उद्या १० मे रोजीे एक महिना पूर्ण होत आहे. घटना घडल्यानंतर हदगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवायला १४ दिवस लावले आणि आता १५ दिवस उलटून गेले, आरोपींना पोलिसांनी अटक केली नाही. एकूणच याप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. पत्नी सविता हिचे मन्मथ बिडवे नावाच्या शिक्षकासोबत अनैतिक संबंध होते. १० एप्रिल रोजी सविता व मन्मथला ‘नको त्या अवस्थेत’ दिलीपने पाहिले. या बाबीचा मनावर परिणाम होवून दिलीपने त्याच दिवशी विषारी द्रव्य सेवन केले. त्याच दिवशी दिलीपचा मृत्यू झाला. ११ एप्रिल रोजी त्याच्या शवाचे विच्छेदन करण्यात आले. १३ एप्रिल रोजी दिलीपच्या मोटारसायकलच्या डिकीमध्ये एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत त्याने उपरोक्त बाब नमूद करुन आत्महत्या करीत असल्याचे स्पष्ट लिहीले. चिठ्ठीतील मजकूर प्रिय आई-वडील, मी माझ्या बायकोचे नायायज संबंध बिडवेसर सोबत माझ्यासमक्ष पाहिले असून, बिडवेसर यांनी आज जेंव्हा माझा व मित्राचा फोन व मोबाईल उचलला नाही व ते स्वत: माझ्या बायकोसोबत मी रंगेहाथ पकडून मी त्यांना मारहाण करत असताना स्वत: माझ्या बायकोने पकडले असून मी त्यांना उद्या बोलूत, असे म्हणताना ते स्वत: पळून गेले आहे. त्यात त्याच्यासोबत माझी बायको तेवढी जबाबदार आहे, म्हणून मी स्वत: त्यांचे बिडवेसर यांची ड्युटी गोर्लेगाव येथे आहे. त्यांना माफ करु नये व त्याच्या सोबत घाण संबंध ठेवणारी माझी बायको सविता हिला जास्तीत जास्त सजा करावी ही नम्र विनंती. बिडवे सर मो. ९४२१०५०१२०. माझे मुलं साभांळ मायं... नवघरे कुटुंबियांची कैफियत चिठ्ठी मिळाल्यानंतर दिलीपच्या नातेवाईकांनी हदगावचे पोलिस निरीक्षक अरुण बस्ते यांची भेट घेतली, मात्र बस्ते यांनी गुन्हा न नोंदवता नवघरे कुटुंबियांची मनधरणी करुन परत पाठविले नवघरे कुटुंबियांनी नंतरही चार ते पाच वेळा पोलिस ठाण्याच्या चकरा मारल्या, मात्र गुन्हा नोंद करण्यात आला नाही कंटाळून नवघरे कुटुंबिय भोकरचे उपाधीक्षक दत्तात्रय कांबळे यांना भेटले, कांबळे यांनी फोन लावून गुन्हा नोंदविण्याचा आदेश दिला, मात्र पोलिस बधले नाहीत. १८ एप्रिल रोजी पुन्हा नवघरे कुटुंबिय कारवाईच्या मागणीसाठी हदगाव पोलिसात गेले व त्यांनी लेखी तक्रार दिली. ड्युटीवर उपस्थित ठाणेअंमलदार यांनी तक्रार घेतली मात्र पोहोच दिलीच नाही. २४ एप्रिल रोजी नवघरे कुटुंबिय पोलिसांना भेटले २४ रोजी रात्री उशिरा पोलिसांंनी अखेर गुन्हा नोंदविला. गुन्हा नोंदवून १५ दिवस उलटून गेले तरीही पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही. आरोपींच्या अटकेसाठी लातूर जिल्हा आणि नांदेड जिल्ह्यातील हदगाव, कंधार तालुक्यात पोलिसांची पथके पाठवून शोध घेतला, मात्र आरोपी मिळाले नाहीत. ते अद्यापही फरार आहेत. त्यांना जामीन मिळालेला नाही- अरुण बस्ते, पोलिस निरीक्षक, हदगाव