शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कवींनी मनाची दारे उघडी ठेवावी

By admin | Updated: August 24, 2014 23:34 IST

नांदेड : कविता समजून घेण्यासाठी सुक्ष्म संवेदनशिलता लागते असे प्रतिपादन मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी केले़

नांदेड : नांदेडमध्ये असणारी रसिकता आणि साहित्य मुंबईत पहायला मिळत नाही़ कविता समजून घेण्यासाठी सुक्ष्म संवेदनशिलता लागते ती नांदेडच्या रसिक, कवींमध्ये आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी तथा मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी केले़ महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक श्रद्धा बेलसरे खारकर यांच्या ‘फाईल आणि इतर कविता’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील तर ज्येष्ठ समीक्षक डॉ़ सुहास जेवळीकर, निर्मल प्रकाशनचे संचालक निर्मलकुमार सूर्यवंशी, श्रद्धा बेलसरे यांची मंचावर उपस्थिती होती़ प्रारंभी कवितासंग्रहाचे प्रकाशन डहाके यांच्या हस्ते करण्यात आले़ डहाके म्हणाले, कविंनी नेहमी मनाची दारं उघडी ठेवली पाहिजे़ शासकीय कामात आयुष्य घालवणाऱ्या श्रद्धा बेलसरे यांनी मनाची दारं उघडी ठेवून कार्य करीत राहिल्यामुळेच त्या कवयित्री होवू शकल्या़ मानवी भावबंद आणि संवेदनशिलता यामुळेच त्यांच्या कविता प्रेमवृत्ती व्यक्त करणाऱ्या आहेत़ आयुष्यात कधी प्रेम-प्रेमभाव कमी होत नसतो तर ते व्यक्त करणाच्या पद्धती बदलत असतात असे सांगत डहाके म्हणाले प्रेम हा एक मानवी अनुभव आहे़ ताटातुट, मानवी दुरावा आदी गोष्टी विघातक असून त्या कविला नको आहेत, हे श्रद्धा बेलसरे यांच्या कवितांतून स्पष्ट जाणवते़ ज्येष्ठ समीक्षक डॉ़ सुहास जेवळीकर म्हणाले, आज माहिती आणि ज्ञानाची गल्लत होत आहे़ माहिती आणि अनुभवाच्या सांगडीतून ज्ञानाचे लोणी तयार होते, हे लक्षात घेतले पाहिजे़ सृजलनशिलता, कल्पकतेकडे आपण लक्ष देत नाही़ माणूस आणि निसर्गाला आपण वेगळे संबोधत आहोत त्यामुळे माणसामध्ये अहंकार निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले़ बेलसरे यांच्या कविता सामाजिक भान असलेल्या आणि आत्मभान ठेवून लिहिलेल्या आहेत़ त्यामध्ये कुठेही आक्रमकता दिसत नसल्याचेही त्यांनी सांगितले़ समारोपात माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील म्हणाल्या, आठवीत असतांना केलेल्या कवितांची वही रद्दीमध्ये हरवली़ माझी कविता माझ्या घरच्यांनीच संपवल्या, अशा शब्दात खंत व्यक्त करीत ४२ वर्षापासून कवितेचे आणि आपले नाते तुटले़ परंतु, साहित्यिक, लेखक आणि कवी यांच्यापासून माझी कधीच सुटका झाली नाही़ त्यांचा सहवास मला नेहमीच लाभत राहिला, त्यामुळे मला त्यांच्याशी असलेले भावबंद कधीच संपवता आले नाही, असेही त्यांनी सांगितले़ श्रद्धा बेलसरे, आशा पैठणे आणि त्यांच्या मैत्रीविषयी बोलतांना त्यांनी उपस्थितांना भाऊक केलं़ प्रास्ताविक निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी केले़ आशा पैठणे यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)