शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कविता म्हणजे कवीची विवेकी जीवनदृष्टी

By admin | Updated: September 8, 2014 00:33 IST

औरंगाबाद : कविता केवळ शब्दांचा खेळ वा ओळींची उतरंड नसून, ती कवीची विवेकी जीवनदृष्टी असते.

औरंगाबाद : कविता केवळ शब्दांचा खेळ वा ओळींची उतरंड नसून, ती कवीची विवेकी जीवनदृष्टी असते. काव्यलेखनासारखे जबाबदारीचे, मौलिक कृत्य करताना कवी संतत्वाकडे प्रवास करू लागतो. कवी कविता लिहीत राहील तोवर समाजातील विषमता व विसंगतींनाही टोकदार उत्तर मिळत राहील, अशी भावना कवी, कादंबरीकार रमेश इंगळे- उत्रादकर यांनी रविवारी व्यक्त केली. प्रतिभावंत साहित्यिक बी. रघुनाथ यांच्या स्मृतिदिनी आयोजित बी. रघुनाथ स्मृतिसंध्येत इंगळे बोलत होते. नाथ ग्रुप, परिवर्तन व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आयोजित या सोहळ्यात रमेश इंगळे यांना लेखक संजय भास्कर जोशी यांच्या हस्ते बी. रघुनाथ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी सतीश कागलीवाल, नंदकिशोर कागलीवाल, डॉ. भालचंद्र कांगो, प्रा. डॉ. मोहन फुले, अजित दळवी, श्रीकांत उमरीकर, सीताराम अग्रवाल, हनुमानप्रसाद बगडिया व शिव फाळके उपस्थित होते. इंगळे म्हणाले की, कवितेतून कवी आपला आतला आवाज शब्दांत गोठवत असतो. केवळ जातिवंत वाचकच हा आवाज ऐकू शकतो. कवितेला सोबत घेऊनच कवी जगतो. व्यवस्थेशी होणारा संघर्ष हा कवीच्या जगण्याचाच भाग असतो. यातून त्याच्यासह त्याची कविताही समृद्ध होते. मात्र, कविता निर्वात पोकळीत निर्माण होत नसून तिला काही एक सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक अधिष्ठान लागते, असेही ते म्हणाले. मनोगताच्या शेवटी त्यांनी वाचलेल्या ‘हे माझे आई’ व ‘यत्किंचित दु:खाचे कारण’ या दोन कवितांना रसिकांची उत्कट दाद मिळाली. नात्यातील हरवत जाणारी ओल, आटणारा संवाद याचा वेध घेते. महेश अचिंतलवार यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला साहित्यक्षेत्रातील मान्यवर व रसिक उपस्थित होते.