शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

पैठण-अजिंठा ३ तासांत

By admin | Updated: September 5, 2014 00:53 IST

औरंगाबाद : गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या औरंगाबाद- अजिंठा- फर्दापूर आणि औरंगाबाद- पैठण रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.

औरंगाबाद : गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या औरंगाबाद- अजिंठा- फर्दापूर आणि औरंगाबाद- पैठण रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. या दोन्ही रस्त्यांच्या चौपदरीकरणानंतर पैठण- अजिंठा हे अंतर अवघ्या अडीच ते तीन तासांत कापता येणे शक्य होईल. त्यामुळे आगामी कालावधीत तीर्थक्षेत्र, जायकवाडी धरण, ज्ञानेश्वर उद्यान आणि जगप्रसिद्ध अजिंठा लेणी या दोन ठिकाणी कमी वेळेत जाण्यासाठी सर्वसामान्य वाहनधारकांबरोबर देश- विदेशातील पर्यटकांना मोठी सुविधा होणार आहे. औरंगाबाद- अजिंठा- फर्दापूर आणि औरंगाबाद- पैठण रस्त्यांवर टोल आकारणी करून बीओटी तत्त्वावर त्यांचा विकास करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधांच्या उपसमितीने बुधवारी मंजुरी दिली. औरंगाबाद- अजिंठा- फर्दापूर या ९९ कि.मी. रस्त्याचा ७७५ कोटी रुपये खर्च करून विकास करण्यात येणार आहे. त्याचबरोबर औरंगाबाद- पैठण या ४५ कि.मी. रस्त्याचा २३९ कोटी रुपये खर्च करून विकास करण्यात येईल. औरंगाबादपासून काही अंतरावर असलेले पैठण शहर तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. जगप्रसिद्ध वेरुळ, अजिंठा लेणी, दौलताबाद आणि औरंगाबाद शहरातील पर्यटनस्थळांबरोबरच एक पर्यनस्थळ म्हणून पैठण येथेही पर्यटकांची गर्दी असते. शिवाय, जायकवाडी धरण, ज्ञानेश्वर उद्यान यासाठी पैठण प्रसिद्ध आहे. पैठण आणि चितेगावची औद्योगिक वसाहतही आहे. त्यामुळे औरंगाबाद- पैठण रस्ता वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरतो; परंतु गेल्या काही वर्षांत या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मृत्यूचा महामार्ग म्हणून रस्त्याची ओळख निर्माण होत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून रस्त्याच्या चौपदरीकरणाची प्रतीक्षा वाहनधारकांना लागली आहे, तर दुसरीकडे औरंगाबाद- अजिंठा रस्ता सध्या दोन पदरी असून अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी देश- विदेशातून दरवर्षी लाखो पर्यटक येतात. त्यामुळे औरंगाबाद- फर्दापूर हा रस्ता पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरतो; परंतु अरुंद रस्ता, विविध ठिकाणी असलेल्या गावांमुळे वाहतुकीस ठिकठिकाणी अडथळा येतो. त्यामुळे पर्यटकांना कमी वेळेत या ठिकाणी पोहोचण्यासाठी अडचणी येतात.२०१६ अखेरीस पूर्णबांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर हे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. यामध्ये राज्य आणि केंद्राच्या निधीचा वाटा असेल. या प्रकल्पांच्या निविदांना मान्यता देण्यात आल्यानंतर आता त्यांना केंद्रांची मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा करावी लागेल. दोन्ही प्रकल्पांत केंदाचा २० टक्के निधीचा वाटा आहे. केंद्राची मंजुरी मिळण्यास कोणतीही अडचण नाही. त्यामुळे लवकरच संबंधित प्रकल्पांच्या कंत्राटदरांना वर्क आर्डर मिळेल; परंतु आचारसंहितेची अडचण येऊ शकते का? याकडे बघावे लागेल, अशी माहिती जागतिक बँक प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद- अजिंठा- फर्दापूर आणि औरंगाबाद- पैठण रस्त्याचे काम करण्याचा कालावधी दोन वर्षांचा राहणार आहे. त्यामुळे २०१६ च्या अखेरीस दोन्ही रस्ते पूर्ण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. औरंगाबादहून अजिंठ्याला जाण्यासाठी सध्या जवळपास अडीच तास लागतात; परंतु औरंगाबाद- अजिंठा- फर्दापूर या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर औरंगाबादहून अजिंठ्याला अवघ्या दीड तासात पोहोचणे शक्य होणार आहे. औरंगाबाद- पैठण मार्गाचे चौपदीकरण झाल्यानंतर औरंगाबादहून अवघ्या ४५ मिनिट ते एक तासात पैठण गाठता येईल. त्यामुळे पैठण- अजिंठा हे अंतर तीन तासांत कापणे शक्य होईल.या रस्त्यांवर वेळोवेळी वाहतुकीच्या कोंडीच्या समस्येला वाहनधारकांना सामोरे जावे लागते. चौपदीरकरणानंतर ही समस्या कायमची थांबेल. त्यामुळे वाहनधारकांच्या वेळेची बचत होईल. शिवाय, इंधनाचीही मोठी बचत होईल.