शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

'नुकसानग्रस्त लाखांत, तक्रारी केवळ ४ हजार ३३०'; वेळेत तक्रार न केल्याने वंचित राहणार शेतकरी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 12:51 PM

जालना, बीड, औरंगाबाद या ३ जिल्ह्यांत ८ लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्र सप्टेंबरअखेर प्राथमिक अंदाजानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले.

ठळक मुद्देअनेक शेतकऱ्यांनी वेळेत तक्रार केली नाही  ७२ तासांत ऑनलाइन तक्रार कराउशिरा तक्रारी विमा कंपन्यांनी नाकारल्या

औरंगाबाद : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील ८ लाख २४ हजार ७५२ शेतकऱ्यांनी ३ लाख ५६ हजार ८५७ हेक्टरवरील खरीप हंगामातील विविध पिकांचा विमा हप्ता भरला. मात्र, सप्टेंबर व ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या पावसात सुमारे २ लाख ६५ हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. मात्र, ४ हजार ३३० शेतकऱ्यांनी नुकसानीच्या ७२ तासांच्या आत ऑनलाइन तक्रारी केल्या. त्यामुळे तक्रारींव्यतिरिक्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जालना, बीड, औरंगाबाद या ३ जिल्ह्यांत ८ लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्र सप्टेंबरअखेर प्राथमिक अंदाजानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. त्यात १० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना नुकसानीची झळ पोहोचली असताना कृषी विभागाकडे आलेल्या तक्रारी फक्त २० हजार ७२ आाहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील ८ लाख २४ हजार ७५२ शेतकऱ्यांनी आपल्या ३ लाख ५६ हजार ८५७ हेक्टरवरील खरीप हंगामातील विविध पिकांचा ३६६ कोटी ८९ लाख ७८ हजार १६० रुपयांचा विमा हप्ता भरला. त्यामुळे १,२५१ कोटी ७३ हजार ७४६ रुपयांचे विमा संरक्षण मिळविले. बाधित शेतकऱ्यांकडून तक्रारी वेळेत होत नसल्याने कंपन्यांकडून नुकसानीचे दावे फेटाळले जातात, तसेच नुकसानीचे पंचनामे करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गेलेल्या अहवालानुसार शासन मदतीचे वाटप सध्या सुरू आहे, असेही ते म्हणाले.

७२ तासांत ऑनलाइन तक्रार करापीकविम्यासाठी नुकसानीच्या तीन दिवसांत तक्रार कृषी विभाग किंवा विमा कंपनीच्या पोर्टलवर ऑनलाइन तक्रार करावी लागते. तक्रारींचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई विमा कंपनी देते, असे कृषी विभागाचे सहसंचालक डाॅ. दिनकर जाधव यांनी सांगितले.

उशिरा तक्रारी विमा कंपन्यांनी नाकारल्या१९ ऑक्टोबरपर्यंत केवळ जालना जिल्ह्यातून ऑफलाइन ५६३ तक्रारी करण्यात आल्या. जालना जिल्ह्यातून आलेल्या एकूण ८,०१६ तक्रारींपैकी ३,३८१ तक्रारी उशिरा, १,२६६ पीक उभे नसताना, तर बीडमधील २४९ तक्रारी पीक उभे नसताना, ३४५ तक्रारी इतर कारणांनी रिजेक्ट केल्या गेल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील १९ तक्रारी नाकारल्या गेल्या. विमा कंपन्यांकडून करण्यात आल्याची माहिती डाॅ. जाधव यांनी दिली.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादfundsनिधी