शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील हलक्या सरींनी महावितरणचे पितळ उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 19:09 IST

मागील तीन दिवसांपासून शहरातील वीजपुरवठा रोज खंडित होत आहे. मंगळवारी शहरात पावसाच्या हलक्या सरींनीही अनेक भागांतील वीज गुल झाल्यामुळे महावितरणचे पितळ उघडे पडले.

ठळक मुद्देगेल्या तीन दिवसांपासून शहरात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे.मंगळवारी दुपारीच निम्म्या शहरातील वीजपुरवठा तब्बल दोन-तीन तास खंडित झाला होता.

औरंगाबाद : मागील तीन दिवसांपासून शहरातील वीजपुरवठा रोज खंडित होत आहे. मंगळवारी शहरात पावसाच्या हलक्या सरींनीही अनेक भागांतील वीज गुल झाल्यामुळे महावितरणचे पितळ उघडे पडले. छावणी उपविभागांतर्गत नंदनवन कॉलनी, भीमनगर, भावसिंगपुरा परिसरातील वीजपुरवठा दिवसभरातून तीन ते चार वेळा खंडित झाल्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.  

गेल्या तीन दिवसांपासून शहरात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. मंगळवारी दुपारीच निम्म्या शहरातील तब्बल दोन-तीन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. सायंकाळी अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे लगेच गारखेडा, पन्नालालनगर, सूतगिरणी चौक, शिवाजीनगर, सातारा, देवळाई, सिडको एन-८, सिडको एन-३, सिडको एन-४, कांचनवाडी, हिंदुस्तान आवास परिसर, छावणी, नंदनवन कॉलनी, संगीता कॉलनी, भीमनगर, भावसिंगपुरा आदी भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. सातारा-देवळाई आणि सिडको-हडकोतील वसाहतींमध्ये तब्बल तीन तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यास महावितरणच्या कर्मचाऱ्यांना यश आले. मागील तीन दिवसांपासून छावणी उपविभागाला होणारी ३३ केव्ही लाईनमध्ये बिघाड झाल्याचे महावितरणच्या वतीने सांगण्यात येते. 

मंगळवारीही दुपारनंतर तब्बल चार- पाच तास वीज गायब झाली. सायंकाळी वीज आली आणि पुन्हा नंदनवन कॉनली, संगीता कॉलनी, भीमनगर, भावसिंगपुरा भागाची वीज गेली. यासंदर्भात नागरिकांनी छावणी उपविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु अधिकाऱ्यांनी मोबाईल बंद करून ठेवले. त्यामुळे भीमनगर येथील रहिवाशांनी छावणी उपविभागात जाऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा उपविभागात एकच कर्मचारी बसलेला होता. त्या कर्मचाऱ्यासमक्षही नागरिकांनी अधिकाऱ्यांनी संपर्क साधला; पण तेव्हाही त्यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही. त्या कर्मचाऱ्याने लाईनमनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एकाही लाईनमनने त्यांचा फोन घेतला नाही. 

मान्सूनपूर्व दुरुस्तीपावसाळ्यामध्ये वीज यंत्रणेत बिघाड होऊ नये यासाठी महावितरणच्या वतीने दरवर्षी मान्सूनपूर्व दुरुस्ती करण्यात येते. त्यामध्ये वीजवाहिन्यांवर आलेल्या झाडांच्या फांद्या कापणे, ट्रान्सफॉर्मरची देखभाल आणि दुरुस्ती, खाली आलेल्या वीजवाहिन्यांना कंडक्टर लावणे अथवा कंडक्टर बदलणे, फिडर आणि पिलरची देखभाल तसेच दुरुस्ती आदी कामे करण्यात येतात. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात या कामांचा शुभारंभ करण्यात येतो. यंदाही मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामांना सुरुवात झाली असून, या कामाच्या नावाखाली चार-पाच तास वीजपुरवठा खंडित केला जात असल्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणRainपाऊसelectricityवीजAurangabadऔरंगाबाद