शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
3
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
4
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
7
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
8
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
9
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
10
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
11
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
12
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
13
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
14
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
15
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
16
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
17
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
18
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
19
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
20
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता

दमणगंगेतून मराठवाड्याला फक्त २५ टीएमसीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 17:11 IST

मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

ठळक मुद्देलोकमतचे वृत्त ठरले खरे जलआराखडा तयार

औरंगाबाद : दमणगंगेचे ५० टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्याबाबत घोषणा होत आल्या असल्या तरी सध्या फक्त २५ टीएमसी पाणीच विभागाकडे वळविण्यासाठी निविदा काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी महाजनादेश यात्रेच्या सभेत बोलताना स्पष्ट केले. उर्वरित २५ टीएमसी पाण्याच्या आराखड्यासाठी डीपीआर तयार झाल्यानंतर विचार केला जाईल, असेही ते म्हणाले. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील जाहीर सभेत ते बोलत होते. 

लोकमतने २७ आॅगस्टच्या अंकात दमणगंगेतून मराठवाड्याला ५० टीएमसी पाणी देण्यापूर्वीच कपातीच्या हालचाली सुरू झाल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. लोकमतचे ते वृत्त खरे ठरले असून, मुख्यमंत्र्यांनीच २५ टीएमसी पाण्यासाठी निविदा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री म्हणाले, मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. विभाग दुष्काळमुक्त करण्यासाठी वॉटरग्रीड तयार करण्यात येणार आहे. ६४ हजार कि़मी.च्या या ग्रीडद्वारे प्रत्येक गावात व शहरात पाईपलाईनद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाईल. २० हजार कोटी रुपये वॉटर ग्रीडसाठी मंजूर केले आहेत. मराठवाड्यातील गोदावरी खोऱ्याची अवस्था बिकट आहे. नाशिकमध्ये पाऊस झाला तर जायकवाडी धरण भरते. नसता ते धरण रिक्त राहते. गोदावरीची तूट भरून काढण्यासाठी कोकणातून समुद्रात वाहून जाणारे ३०० टीएमसी पाणी उचलण्याची शासनाची योजना आहे. त्यातील १६७ टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणले जाईल.

मराठवाड्यासाठी दमणगंगा - वैतरणा-गोदावरी प्रकल्पाला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. त्यानुसार जलआराखडा तयार करण्यात आला असून, २५ टीएमसी पाणी उचलण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे. उर्वरित २५ टीएमसीसाठी डीपीआरचे काम हाती घेण्यात येईल. त्यानंतर त्याचा विचार होईल. या योजनेसाठी निधी कमी पडू देणार नाही. कृष्णा खोऱ्यातून पाणी बीड जिल्ह्याकडे वळविण्यासाठी बोगद्याचे काम सुरू आहे. ब्रह्मगव्हाणच्या योजनेसाठी तरतूद केली आहे. तसेच ४५० कोटींचा प्रकल्प खुलताबाद, म्हैसमाळ, वेरूळ विकासासाठी मंजूर केला आहे. 

औरंगाबाद-जालना उद्योगाचे मॅग्नेट डीएमआयसी अंतर्गत पहिली आॅरिक सिटी तयार होत आहे. तेथे उद्योग, गुंतवणुकीस सुरुवात झाली आहे. समृद्धी महामार्ग झाल्यानंतर या राज्याचे उद्योगाचे मॅग्नेट औरंगाबाद व जालना असेल.समृद्धी व डीएमआयसीमुळे पोर्ट कनेक्टिव्हिटी साडेतीन तासांत होईल. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबाद