शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दमणगंगेतून मराठवाड्याला फक्त २५ टीएमसीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 17:11 IST

मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

ठळक मुद्देलोकमतचे वृत्त ठरले खरे जलआराखडा तयार

औरंगाबाद : दमणगंगेचे ५० टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्याबाबत घोषणा होत आल्या असल्या तरी सध्या फक्त २५ टीएमसी पाणीच विभागाकडे वळविण्यासाठी निविदा काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी महाजनादेश यात्रेच्या सभेत बोलताना स्पष्ट केले. उर्वरित २५ टीएमसी पाण्याच्या आराखड्यासाठी डीपीआर तयार झाल्यानंतर विचार केला जाईल, असेही ते म्हणाले. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील जाहीर सभेत ते बोलत होते. 

लोकमतने २७ आॅगस्टच्या अंकात दमणगंगेतून मराठवाड्याला ५० टीएमसी पाणी देण्यापूर्वीच कपातीच्या हालचाली सुरू झाल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. लोकमतचे ते वृत्त खरे ठरले असून, मुख्यमंत्र्यांनीच २५ टीएमसी पाण्यासाठी निविदा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री म्हणाले, मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. विभाग दुष्काळमुक्त करण्यासाठी वॉटरग्रीड तयार करण्यात येणार आहे. ६४ हजार कि़मी.च्या या ग्रीडद्वारे प्रत्येक गावात व शहरात पाईपलाईनद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाईल. २० हजार कोटी रुपये वॉटर ग्रीडसाठी मंजूर केले आहेत. मराठवाड्यातील गोदावरी खोऱ्याची अवस्था बिकट आहे. नाशिकमध्ये पाऊस झाला तर जायकवाडी धरण भरते. नसता ते धरण रिक्त राहते. गोदावरीची तूट भरून काढण्यासाठी कोकणातून समुद्रात वाहून जाणारे ३०० टीएमसी पाणी उचलण्याची शासनाची योजना आहे. त्यातील १६७ टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणले जाईल.

मराठवाड्यासाठी दमणगंगा - वैतरणा-गोदावरी प्रकल्पाला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. त्यानुसार जलआराखडा तयार करण्यात आला असून, २५ टीएमसी पाणी उचलण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे. उर्वरित २५ टीएमसीसाठी डीपीआरचे काम हाती घेण्यात येईल. त्यानंतर त्याचा विचार होईल. या योजनेसाठी निधी कमी पडू देणार नाही. कृष्णा खोऱ्यातून पाणी बीड जिल्ह्याकडे वळविण्यासाठी बोगद्याचे काम सुरू आहे. ब्रह्मगव्हाणच्या योजनेसाठी तरतूद केली आहे. तसेच ४५० कोटींचा प्रकल्प खुलताबाद, म्हैसमाळ, वेरूळ विकासासाठी मंजूर केला आहे. 

औरंगाबाद-जालना उद्योगाचे मॅग्नेट डीएमआयसी अंतर्गत पहिली आॅरिक सिटी तयार होत आहे. तेथे उद्योग, गुंतवणुकीस सुरुवात झाली आहे. समृद्धी महामार्ग झाल्यानंतर या राज्याचे उद्योगाचे मॅग्नेट औरंगाबाद व जालना असेल.समृद्धी व डीएमआयसीमुळे पोर्ट कनेक्टिव्हिटी साडेतीन तासांत होईल. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबाद