शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
2
अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
3
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
4
जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
5
'३ इडियट्स'च्या सीक्वलबाबत आर माधवन स्पष्टच बोलला, म्हणाला- "आम्ही आता म्हातारे झालोय..."
6
सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा, Vodafone-Idea चे शेअर्स वधारले; AGR वर मिळू शकते गुड न्यूज
7
१० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
8
तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? फक्त 'हा' एक कोड डायल करा आणि काही सेकंदात सत्य जाणून घ्या
9
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
10
२९ महानगरपालिकांचे विरोधक आहे तरी कोण हेच कळेना! महायुती, मविआचेही तीनतेरा
11
भांडुप बस दुर्घटनेत बालकलाकाराच्या आईचा मृत्यू, १२ वर्षीय लेकीच्या डोळ्यासमोरच घडला अपघात
12
२०२५ संपण्याआधी 'या' तीन व्यक्तींचे आभार मानायला विसरू नका; मिळेल नव्या वर्षाची ऊर्जा 
13
"नोकऱ्या सोडून पक्षाच्या मागे पळालो, काय केलं आमच्याबरोबर"; दहिसरमध्ये भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर
14
२०२६ मध्ये निफ्टी ३२,००० आणि सेन्सेक्स १,०७,००० च्या पातळीवर पोहोचू शकतो; काय आहे ब्रोकरेजचं टार्गेट?
15
जळगावात महायुतीचा 'फॉर्म्युला' ठरला; भाजप दोन पावले मागे, शेवटच्या दिवशी ७६३ अर्ज
16
महापालिका निवडणूक 2026: राष्ट्रवादी (अजित पवार) भाजपासोबत! काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी; शिंदेसेना, उद्धवसेना, वंचितचे 'एकला चलो रे'
17
२०२६चा पहिला महिना महादेवांना: ३ प्रदोष व्रतांचा संयोग, कालातीत कृपा-लाभ संधी, शिव शुभ करतील!
18
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
19
Stock Market Today: नव्या सीरिजची दमदार सुरुवात; Sensex २०० अंकांनी वधारला, मेटल शेअर्समध्ये मोठी तेजी
20
२०२६च्या पहिल्याच दिवशी प्रदोष, ‘असे’ करा व्रतपूजन; शिव मंत्र ठरेल रामबाण, वर्षभर मिळेल लाभ!
Daily Top 2Weekly Top 5

दमणगंगेतून मराठवाड्याला फक्त २५ टीएमसीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 17:11 IST

मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

ठळक मुद्देलोकमतचे वृत्त ठरले खरे जलआराखडा तयार

औरंगाबाद : दमणगंगेचे ५० टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्याबाबत घोषणा होत आल्या असल्या तरी सध्या फक्त २५ टीएमसी पाणीच विभागाकडे वळविण्यासाठी निविदा काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी महाजनादेश यात्रेच्या सभेत बोलताना स्पष्ट केले. उर्वरित २५ टीएमसी पाण्याच्या आराखड्यासाठी डीपीआर तयार झाल्यानंतर विचार केला जाईल, असेही ते म्हणाले. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील जाहीर सभेत ते बोलत होते. 

लोकमतने २७ आॅगस्टच्या अंकात दमणगंगेतून मराठवाड्याला ५० टीएमसी पाणी देण्यापूर्वीच कपातीच्या हालचाली सुरू झाल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. लोकमतचे ते वृत्त खरे ठरले असून, मुख्यमंत्र्यांनीच २५ टीएमसी पाण्यासाठी निविदा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री म्हणाले, मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. विभाग दुष्काळमुक्त करण्यासाठी वॉटरग्रीड तयार करण्यात येणार आहे. ६४ हजार कि़मी.च्या या ग्रीडद्वारे प्रत्येक गावात व शहरात पाईपलाईनद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाईल. २० हजार कोटी रुपये वॉटर ग्रीडसाठी मंजूर केले आहेत. मराठवाड्यातील गोदावरी खोऱ्याची अवस्था बिकट आहे. नाशिकमध्ये पाऊस झाला तर जायकवाडी धरण भरते. नसता ते धरण रिक्त राहते. गोदावरीची तूट भरून काढण्यासाठी कोकणातून समुद्रात वाहून जाणारे ३०० टीएमसी पाणी उचलण्याची शासनाची योजना आहे. त्यातील १६७ टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणले जाईल.

मराठवाड्यासाठी दमणगंगा - वैतरणा-गोदावरी प्रकल्पाला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. त्यानुसार जलआराखडा तयार करण्यात आला असून, २५ टीएमसी पाणी उचलण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे. उर्वरित २५ टीएमसीसाठी डीपीआरचे काम हाती घेण्यात येईल. त्यानंतर त्याचा विचार होईल. या योजनेसाठी निधी कमी पडू देणार नाही. कृष्णा खोऱ्यातून पाणी बीड जिल्ह्याकडे वळविण्यासाठी बोगद्याचे काम सुरू आहे. ब्रह्मगव्हाणच्या योजनेसाठी तरतूद केली आहे. तसेच ४५० कोटींचा प्रकल्प खुलताबाद, म्हैसमाळ, वेरूळ विकासासाठी मंजूर केला आहे. 

औरंगाबाद-जालना उद्योगाचे मॅग्नेट डीएमआयसी अंतर्गत पहिली आॅरिक सिटी तयार होत आहे. तेथे उद्योग, गुंतवणुकीस सुरुवात झाली आहे. समृद्धी महामार्ग झाल्यानंतर या राज्याचे उद्योगाचे मॅग्नेट औरंगाबाद व जालना असेल.समृद्धी व डीएमआयसीमुळे पोर्ट कनेक्टिव्हिटी साडेतीन तासांत होईल. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबाद