शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

मराठवाड्यातील प्रकल्पांत फक्त ०.२३ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 2:26 PM

 जायकवाडीतही कमी जलसाठा

ठळक मुद्देदमदार पावसाची प्रतीक्षा  मान्सून सुरू होऊन ३७ दिवस झाले आहेत.

औरंगाबाद : मान्सून सुरू होऊन ३७ दिवस झाले आहेत. मात्र, या ३७ दिवसांत दमदार पाऊस न झाल्यामुळे मराठवाड्यातील एकाही मोठ्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा होऊ शकलेला नाही. जायकवाडीचा मृतसाठादेखील अजून जिवंतसाठ्यात आलेला नाही. ११ मोठ्यांसह सर्व प्रकल्पांत ३७ दिवसांत ०.२३ टक्के पाणी आलेले आहे. गेल्या आठवड्यात सर्व प्रकल्पांत ०.४५ इतका जलसाठा जूनअखेरीस होता. तो आता ०.६८ टक्के झाला आहे. 

विभागात ११ मोठे प्रकल्प आहेत. १२ दलघमी इतका उपयुक्त जलसाठा त्या प्रकल्पांत आहे. ७५ मोठ्या प्रकल्पांत २१.७४ दलघमी तर ७४९ लघुप्रकल्पांत २१.७२६ दलघमी साठा आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून ११ मोठ्या प्रकल्पांच्या क्षेत्रात पावसाने अपेक्षित अशी हजेरी लावली नाही. परिणामी विभागातील धरण क्षेत्रात पाणीसाठा वाढला नाही. मध्यम प्रकल्प क्षेत्रातही पावसाने दडी मारली आहे. लघुप्रकल्प हद्दीत काही ठिकाणी पाऊस झाला; परंतु त्याचा साठा वाढण्यावर परिणाम झालेला नाही. यामुळे काळजी वाढली आहे.पाच वर्षांतील जायकवाडीची स्थिती 

मागील चार वर्षांच्या तुलनेत यंदा जायकवाडीतील पाणीपातळी खालावली आहे. २०१४ मध्ये ७० दलघमी, २०१५ मध्ये २८ दलघमी, २०१६ मध्ये धरण मृतसाठ्यात होते. २०१७ मध्ये ३९० दलघमी पाणी होते तर २०१८ मध्ये ४३९ दलघमी पाणी जायकवाडीत होते. यावर्षी धरण मृतसाठ्यात आहे. गेल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गोदावरीचे पात्र दुथडी भरून वाहिले, मात्र त्याचा फार मोठा फायदा जायकवाडी क्षेत्राला झालेला नाही. 

टॅग्स :WaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादdroughtदुष्काळRainपाऊस