शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

निरीक्षकांनी पाहिला अंत

By admin | Updated: May 17, 2014 01:15 IST

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीचा निकाल जाहीर होण्यास प्रचंड विलंब झाला.

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीचा निकाल जाहीर होण्यास प्रचंड विलंब झाला. मराठवाड्यासह राज्यातील सर्वच मतदारसंघांचे निकाल दुपारपर्यंतच घोषित झाले. मात्र, औरंगाबादचा निकाल जाहीर होण्यास सायंकाळचे ७ वाजले. केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी दिलेल्या सूचनांमुळे हा निकाल लांबल्याचे अधिकार्‍यांनी खाजगीत बोलताना सांगितले. औरंगाबाद मतदारसंघाच्या मतमोजणीचा निकाल दुपारी १२ वाजेपर्यंत घोषित होईल, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला होता. मात्र, मतमोजणीची प्रक्रिया अतिशय संथ सुरू राहिली. त्यामुळे संपूर्ण मतमोजणीस तब्बल ११ तास लागले. सकाळी ८ वाजता सुरू झालेली मतमोजणी सायंकाळी ७ वाजता संपली. एकूण २१ फेर्‍या झाल्या. प्रत्येक फेरीसाठी १० मिनिटे लागतील, असा हिशेब करून चार ते साडेचार तासांत निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. प्रत्यक्ष सायंकाळचे ७ वाजले. त्यामुळे मोजणी कर्मचारी, उमेदवार, त्यांचे मोजणी प्रतिनिधी, पत्रकार, कार्यकर्ते, बंदोबस्तावरील पोलीस, अशा सगळ्यांची गैरसोय झाली. ११ तास थांबावे लागल्यामुळे सगळेच अक्षरश: कंटाळून गेले. दुपारी एकनंतरच बाहेर कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता दिसत होती. कडक ऊन आणि केंद्राबाहेरील अपुरी व्यवस्था, यामुळे उशीर होत होता, तसे कार्यकर्ते अस्वस्थ होत होते. अखेर सायंकाळी ७ वाजता निकाल जाहीर झाला. मराठवाड्यातील आणि राज्यातील इतर सर्व मतदारसंघांचे निकाल दुपारपर्यंतच जाहीर झाले होते. राज्यात सर्वात शेवटचा निकाल औरंगाबादचा ठरला. दरम्यान, केंद्रीय निवडणूक निरीक्षक शालिनी मिश्रा यांनी दिलेल्या सूचनांमुळेच प्रक्रिया लांबल्याचे अधिकार्‍यांनी खाजगीत सांगितले. मिश्रा यांनी पहिल्या फेरीची आकडेवारी घोषित केल्याशिवाय दुसर्‍या फेरीची मोजणी करायची नाही, अशा सूचना दिल्या. त्यामुळेच प्रत्येक फेरीनंतर पुढील फेरीची मोजणी सुरू होण्यास पाच सहा मिनिटांचा अवधी जात होता. परिणामी संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया संपण्यास सहा तासांचा अवधी लागला. निवडणूक निर्णय अधिकारी विक्रमकुमार यांना विचारले असता त्यांनी मात्र, वेगळेच कारण सांगितले. मतमोजणीसाठी आम्ही आकडेवारी नोंदविण्याकरिता कॉम्प्युटराईज व्यवस्थेबरोबरच मॅन्युअली (हाताने नोंद करणे) व्यवस्थाही केली होती.