शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

‘नरेंद्र...देवेंद्र, बेरोजगारीचे केंद्र’; राष्ट्रवादी युवक काँग्रेसने काढली पदव्यांची अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 17:00 IST

तिरडीवर पदव्या ठेऊन शहरातून अंत्ययात्रा 

औरंगाबाद : ‘ नरेंद्र.... देवेंद्र, बेरोजगारीचे केंद्र, रोजगार आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, कामाची नाही आमची डिग्री, फडणवीस सरकार बेफिक्री, अशा लक्षवेधी घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज दुपारी पदव्यांचीच अंत्ययात्रा काढण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख  व प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन करण्यात आले. 

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून ही अंत्ययात्रा सुरू झाली. यात खरोखरची तिरडी तयार करण्यात आली होती. त्यावर पदव्या ठेवण्यात आल्या होत्या. जोरदार घोषणाबाजी करीत ही तिरडी विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत आणण्यात आली. तेथे सामान्य प्रशासन उपायुक्त वर्षा ठाकूर यांना निवेदन सादर करण्यात आले. राज्यभर विभागीय आयुक्त कार्यालय असलेल्या शहरांमध्ये सध्या असे आंदोलन सुरू आहे.  नाशिक झाले. नागपूर, अमरावती आदी ठिकाणीही ते केले जाईल, असे मेहबूब शेख यांनी सांगितले. 

औरंगाबाद शहराध्यक्ष दत्ता भांगे, कार्याध्यक्ष कय्युम शेख, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे, कार्याध्यक्ष रहिम पटेल, अक्षय पाटील, डॉ. कपिल झोटिंग, बीडचे जिल्हाध्यक्ष जयसिंह सोळंके, परभणीचे जिल्हाध्यक्ष शांतस्वरूप जाधव, जालन्याचे प्रभारी आशिष मेटे, औरंगाबादचे प्रभारी कुमार वाळके, विलास मगरे, अभिषेक देशमुख, मयूर सोनवणे, चंदन पाटील आदींच्या सह्यांच्या या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत :दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मिती करावी व त्याची अधिकृत माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर जाहीर करावी,  सर्व रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात, बेरोजगारांना नोकरी मिळेपर्यंत बेरोजगार भत्ता द्यावा, महापोर्टल, महापरीक्षा या यंत्रणांद्वारे होणाऱ्या परीक्षा बंद करून शासकीय विभागामार्फत परीक्षा घेण्यात याव्यात,  प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत खाजगी संस्थांची खैरात बंद करून हा निधी रोजगार निर्मितीकरिता वापरावा, विविध महामंडळांच्या योजनांमध्ये तरुण उद्योजकांना लघुउद्योग स्थापनेसाठी अर्थसाह्य  द्यावे. भाजप सरकारच्या काळातच बेरोजगारीचा दर ६.१ टक्के झाला आहे. एनएसओच्या सर्व्हेनुसार गेल्या पाच वर्षांत दोन कोटी तरुणांनी नोकऱ्या गमावल्या आहेत.

टॅग्स :agitationआंदोलनNCPराष्ट्रवादी काँग्रेसAurangabadऔरंगाबाद