शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

‘नरेंद्र...देवेंद्र, बेरोजगारीचे केंद्र’; राष्ट्रवादी युवक काँग्रेसने काढली पदव्यांची अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 17:00 IST

तिरडीवर पदव्या ठेऊन शहरातून अंत्ययात्रा 

औरंगाबाद : ‘ नरेंद्र.... देवेंद्र, बेरोजगारीचे केंद्र, रोजगार आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, कामाची नाही आमची डिग्री, फडणवीस सरकार बेफिक्री, अशा लक्षवेधी घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज दुपारी पदव्यांचीच अंत्ययात्रा काढण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख  व प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन करण्यात आले. 

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून ही अंत्ययात्रा सुरू झाली. यात खरोखरची तिरडी तयार करण्यात आली होती. त्यावर पदव्या ठेवण्यात आल्या होत्या. जोरदार घोषणाबाजी करीत ही तिरडी विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत आणण्यात आली. तेथे सामान्य प्रशासन उपायुक्त वर्षा ठाकूर यांना निवेदन सादर करण्यात आले. राज्यभर विभागीय आयुक्त कार्यालय असलेल्या शहरांमध्ये सध्या असे आंदोलन सुरू आहे.  नाशिक झाले. नागपूर, अमरावती आदी ठिकाणीही ते केले जाईल, असे मेहबूब शेख यांनी सांगितले. 

औरंगाबाद शहराध्यक्ष दत्ता भांगे, कार्याध्यक्ष कय्युम शेख, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे, कार्याध्यक्ष रहिम पटेल, अक्षय पाटील, डॉ. कपिल झोटिंग, बीडचे जिल्हाध्यक्ष जयसिंह सोळंके, परभणीचे जिल्हाध्यक्ष शांतस्वरूप जाधव, जालन्याचे प्रभारी आशिष मेटे, औरंगाबादचे प्रभारी कुमार वाळके, विलास मगरे, अभिषेक देशमुख, मयूर सोनवणे, चंदन पाटील आदींच्या सह्यांच्या या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत :दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मिती करावी व त्याची अधिकृत माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर जाहीर करावी,  सर्व रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात, बेरोजगारांना नोकरी मिळेपर्यंत बेरोजगार भत्ता द्यावा, महापोर्टल, महापरीक्षा या यंत्रणांद्वारे होणाऱ्या परीक्षा बंद करून शासकीय विभागामार्फत परीक्षा घेण्यात याव्यात,  प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत खाजगी संस्थांची खैरात बंद करून हा निधी रोजगार निर्मितीकरिता वापरावा, विविध महामंडळांच्या योजनांमध्ये तरुण उद्योजकांना लघुउद्योग स्थापनेसाठी अर्थसाह्य  द्यावे. भाजप सरकारच्या काळातच बेरोजगारीचा दर ६.१ टक्के झाला आहे. एनएसओच्या सर्व्हेनुसार गेल्या पाच वर्षांत दोन कोटी तरुणांनी नोकऱ्या गमावल्या आहेत.

टॅग्स :agitationआंदोलनNCPराष्ट्रवादी काँग्रेसAurangabadऔरंगाबाद