शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

चार दशकांपासून गाजतोय औरंगाबादच्या नामकरणाचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:06 IST

औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या नामकरणाचा विषय मागील चार दशकांपासून गाजत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आजपर्यंत ...

औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या नामकरणाचा विषय मागील चार दशकांपासून गाजत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आजपर्यंत स्वतःच्या हितासाठी नामकरणाचा सोयीस्करपणे वापर केला. औरंगाबाद महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेना संभाजीनगरच्या मुद्द्यावर भर देत आहे. आजपर्यंत सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेला चांगले यशही मिळाले. राज्यात शिवसेना पुन्हा एकदा सत्तेत आल्याने आता विरोधी पक्षांकडून संभाजीनगरच्या मुद्द्यावर शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

१९८०च्या दशकात शिवसेनेने औरंगाबादेत आपली पाळेमुळे घट्ट केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद शहरात अनेक झंझावती सभा घेतल्या. या सभांमध्ये त्यांनी औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याची घोषणा केली. तेव्हापासून आजपर्यंत शिवसेना याच मुद्द्यावर लढत आहे. १९९५मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी औरंगाबादच्या नामकरणाचा विषय हाताळला होता. सरकारच्या या निर्णयाविरुद्ध माजी नगरसेवक मुश्ताक अहमद यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने नामकरणाला स्थगिती आदेश दिला होता. त्यानंतर मनोहर जोशी यांनी नामांतरासंदर्भात काढलेली अधिसूचना मागे घेतली होती.

१९८८पासून आजपर्यंत औरंगाबाद शहरात शिवसेनेने महापालिका निवडणुकीत संभाजीनगरच्या मुद्द्यावर भर दिला. त्यामुळे शिवसेनेला सत्ता मिळविणे सोपे गेले. १९ मे १९९५ रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत औरंगाबादच्या नामकरणाचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर ४ जानेवारी २०११ रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दुसरा नामांतराचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात आला. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुन्हा एकदा हा विषय पेटविण्यात आला आहे. स्मार्ट सिटी प्रशासनाने मागील महिन्यात शहरातील टीव्ही सेंटर चौकात ‘सुपर संभाजीनगर’ नावाचा बोर्ड लावला. तेथून वादाची खरी ठिणगी उडाली. भाजपने संभाजीनगरच्या मुद्द्यावर शिवसेनेची चारही बाजूने कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला. सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसने या विषयाला कडाडून विरोध दर्शविला. एमआयएम पक्षाने नेहमीप्रमाणे आक्रमकपणे विरोध सुरू केला आहे.