महापालिकेचा अर्थसंकल्प ७९० कोटींचा
By Admin | Updated: May 21, 2014 01:12 IST2014-05-21T01:11:29+5:302014-05-21T01:12:05+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या वर्ष २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात १२७ कोटी रुपयांची दणदणीत वाढ करण्यात आली आहे.

महापालिकेचा अर्थसंकल्प ७९० कोटींचा
औरंगाबाद : महापालिकेच्या वर्ष २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात १२७ कोटी रुपयांची दणदणीत वाढ करण्यात आली आहे. आता पालिकेचा अर्थसंकल्प ७९० कोटींचा झाला आहे. पालिकेचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. पालिका प्रशासनाने ५४९ कोटी ११ लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर स्थायी समितीने ५ मार्च रोजी ११३ कोटी रुपयांची वाढ केली. त्यानंतर अर्थसंकल्प ६६३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. महापौर कला ओझा यांनी आजच्या सभेत १२७ कोटींची वाढ केल्यामुळे अर्थसंकल्प ७९० कोटी ७ लाखांपर्यंत गेला. वाढविण्यात आलेले १२७ कोटी रुपये एलबीटी मालमत्ताकर, नगररचना विभाग, पाणीपट्टी, अनुदान, मालमत्तांमधून मिळवावेत, असे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले. स्थायी समितीने २०१३-१४ या वर्षाचा शिफारस केलेला सुधारित अर्थसंकल्प बदल न करता मान्य झाला. मावळते सभापती नारायण कुचे यांनी महापौरांना अर्थसंकल्प सादर केला. यावेळी उपमहापौर संजय जोशी, सभागृह नेता सुशील खेडकर, आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे आदींची उपस्थिती होती. औरंगाबाद : महापालिकेच्यावर्ष २०१४-१५ साठी स्थायी समितीने तयार केलेल्या अर्थसंकल्पाची पुस्तिका विरोधी पक्षाचे सदस्य मिल्ािंद दाभाडे यांनी सभागृहातच जाळली. तर महापौर कला ओझा यांनी अर्थसंकल्पीय तरतूद कुणाचे मत विचारात न घेता वाचण्यास सुरुवात केल्याने सदस्य राजू शिंदे यांनी डायसवर चढून राजदंड पळविला. अर्थसंकल्प जाळल्याप्रकरणी संबंधित नगरसेवकाच्या विरोधात पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले. सत्ताधार्यांनी निधीचे समन्यायी वाटप न केल्यामुळे विरोधी पक्षातील सदस्यांनी सभागृहात अर्थसंकल्पीय चर्चा सुरू असताना महापौरांसमोर धरणे दिली. सत्ताधार्यांनी त्यांच्या मागणीला ‘दादागिरी’ करीत असल्याचा टोला लगावल्यामुळे विरोधक आक्रमक झाले. त्यामुळे त्यांनी महापौरांसमोर घोषणाबाजी करीत ठिय्या दिला. राष्ट्रवादीचे गटनेते अफसर खान, विरोधी पक्षनेत्या आशा मोरे, डॉ.जफर खान, जुबेर गाझी, ख्वाजा शरफोद्दीन, मीर हिदायत अली, अशोक बेहडे, अमित भुईगळ, हेमलता मुगदिया, रेखा जैस्वाल, डॉ.नुझहत खान, अज्जू पहेलवान, नासेर खान यांचा त्यात समावेश होता. सत्ताधारी पक्षाकडून सभागृह नेता सुशील खेडकर, संजय केणेकर, उपमहापौरांनी त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. शेवटचे बजेट मनपाचा हा शेवटचा अर्थसंकल्प होता. त्यामुळे सभागृहात सदस्यांनी चर्चा करून विकासकामांसाठी तरतूद करून घेणे गरजेचे होते. मात्र, गदारोळामुळे ते शक्य झाले नाही. -कला ओझा, महापौर तरतूद केलेला निधी कुठे आहे महापालिका कंगाल करण्याचा कारभार सत्ताधारी करीत आहेत. अनेक रस्त्यांची कामे झालेली नाहीत. चार वर्षांपासून तरतूद केलेली असताना निधी कुठे जातो. -काशीनाथ कोकाटे, ज्येष्ठ नगरसेवक विकासकामांवर खर्च दिसत नाही पाणीपट्टी वाढविण्यात आली. समांतर जलवाहिनी न होताच पाणीपट्टी वाढल्यामुळे जनतेला भुर्दंड बसतो आहे. वाढीव पाणीपट्टीतून शहर विकासावर रक्कम खर्च झालेली दिसत नाही. -डॉ.जफर खान, माजी विरोधी पक्षनेते मर्जीतल्या वॉर्डात निधी काही ठराविक नगरसेवकांच्या वॉर्डातच निधी दिला जात आहे. न्याय्य हक्कासाठी बोलले तर सत्ताधारी त्याला दादागिरी म्हणतात. मग मर्जीतल्या वॉर्डात निधी देणे ही दादागिरी नाही का. -अफसर खान, गटनेता दादागिरी शब्द वगळावा दादागिरी हा शब्द वगळण्यात यावा. सूचना केल्या तरी विरोधी पक्ष सदस्य ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे महापौरांनी अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. -सुशील खेडकर, सभागृह नेता सत्ताधारी ऐकून घेत नव्हते महापौरांनी सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले असते तर ३५ कोटी रुपयांची तरतूद आणखी करता आली असती. मात्र, सत्ताधारी कुणाचेही म्हणणे ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हते. -राजू शिंदे, माजी सभापती