शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

औरंगाबादमधील बहुतांश एटीएममध्ये खडखडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 15:17 IST

मशीनमध्ये टाकताच काही तासांत संपतात नोटा

औरंगाबाद : बँकेची एजंट कंपनी सकाळीच एटीएममध्ये नोटा भरतात व अवघ्या काही तासांत ते रिकामे होऊन जाते. यामुळे नागरिकांना एका एटीएमवरून दुसऱ्या एटीएमवर चकरा माराव्या लागत आहेत. ही सत्य परिस्थिती असतानाही बँकेचे अधिकारी मात्र, नोटा टंचाई नसल्याचे सांगत आहेत. तांत्रिक कारणांमुळे नोटा एटीएममधून निघत नसल्याचे सांगितले जात आहे. कारण, काही असले तरी एटीएम कार्डधारकांना त्रास होत आहे. 

रिझर्व्ह बँकेने शहरासाठी मार्च महिन्यात ३०० कोटी रुपयांच्या नोटा पाठविल्या होत्या. तरी पण, एप्रिलच्या पहिल्या तारखेपासूनच एटीएममध्ये खडखडाट जाणवू लागला आहे. आजही अनेक अधिकारी, कर्मचारी आपला पगार एटीएममधूनच काढतात. त्यातही अनेक जण एकदम पगार काढत नाहीत. आवश्यकतेनुसार एटीएममधून रक्कम काढली जाते.  सध्या महिनाअखेरचे दिवस सुरू आहेत. आता लग्नसराई व अन्य कामासाठी पैसे लागतात. यामुळे नागरिकांच्या एटीएममध्ये चकरा वाढल्या आहेत. पण सिडको, एमजीएम रोड, हडको, पुंडलिकनगर, गारखेडा रोड, उल्कानगरी, झांबड इस्टेट रस्ता, रेल्वेस्टेशन रस्ता, बीड बायपास याठिकाणी आमच्या प्रतिनिधीने फिरून माहिती घेतली असता, अनेक एटीएममधून नागरिक खाली हात बाहेर पडत असल्याचे दिसून आले. एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँकांचे काही एटीएम वगळता अन्य  एटीएममध्ये दुपारनंतर खडखडाट निर्माण झाला होता.

एसबीआयचे एटीएम विभागाचे अधिकारी सर्व एटीएममध्ये दररोज नोटा भरल्या जात असल्याचा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात नागरिकांना मात्र रोख रकमेसाठी भटकावे लागत आहे. शहरात व आसपासच्या परिसरात सर्व राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, सहकारी बँकांचे मिळून ७०० एटीएम आहेत. त्यातील किमान ६० टक्के एटीएममध्ये नोटा नसल्याचे आढळून येत आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, रिझर्व्ह बँकेने नागपूर येथून मार्च महिन्यातच शहरातील बँकांच्या पाच करन्सी चेस्टमध्ये सुमारे ३०० कोटी रुपयांच्या नोटा पाठविल्या होत्या. त्यातील काही रक्कम  एटीएमसाठी दिली जाते. पहिले बँकेत काऊंटरवर येणाऱ्या ग्राहकांना प्राधान्य दिले जाते. एका एटीएममध्ये ३० लाख रुपयांच्या नोटा बसतात.  

एटीएममध्ये एकदाच भरली जाते रक्कम बँकेच्या व्यवस्थापकाने सांगितले की, बँकांनी एटीएममध्ये रक्कम भरण्याचे काम आऊटसोर्सिंगद्वारे होते. ज्या एजन्सीज्ला काम दिले त्या दिवसातून एकदाच एटीएममध्ये नोटा भरतात. त्यानंतर दिवसभर त्याकडे ढुंकूनही पाहत नाही. यामुळे एटीएममध्ये नोटा संपल्या तर दुसऱ्या दिवशीच त्या भरल्या जातात. यामुळे खडखडाट जाणवत आहे. 

काही एटीएममध्ये तांत्रिक बिघाड शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांचे ५ एटीएम असे आहेत की, त्यात तांत्रिक बिघाड होऊन मागील तीन ते चार महिन्यांपासून बंद पडले आहेत. याविषयी एटीएम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एटीएम दुरुस्त करण्याची प्रक्रिया मोठी आहे. बँक व्यवस्थापक त्याची माहिती मुख्यालयाला कळवितात. तेथून संबंधित आऊटसोर्सिंग एजन्सीला कळविले जाते. ती एजन्सी इंजिनिअरला पाठविते व एटीएमची तपासणी करून खर्चाची यादी देते. त्यानुसार टेंडर काढले जातात व नंतर एटीएमची दुरुस्ती केली जाते. यास अनेक दिवस लागतात.

टॅग्स :atmएटीएमMONEYपैसाbankबँक