शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार शेतकरी विरोधी

By admin | Updated: October 7, 2014 00:16 IST

अहमदपूर : निसर्गाची साथ नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे़ त्यातच केंद्रातले मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हिताविरोधी आहे़ त्यामुळे शेतकरी उधवस्त झाला आहे़

अहमदपूर : निसर्गाची साथ नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे़ त्यातच केंद्रातले मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हिताविरोधी आहे़ त्यामुळे शेतकरी उधवस्त झाला आहे़ लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदिंनी मोठी आश्वासने दिली़ परंतु मोदींकडे शेतकऱ्यांच्या विकासाची दृष्टी नाही. त्यांना गुजरातच्या पुढे काही दिसतही नाही, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केली़अहमदपूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अहमदपुरात ते सोमवारी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब जाधव होते़ मंचावर उमेदवार बाबासाहेब पाटील, उदगीरचे उमेदवार संजय बनसोडे, निलंग्याचे उमेदवार बस्वराज पाटील नागराळकर, आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डी़एऩ शेळके, अविनाश जाधव, भारत रेड्डी, भाग्यश्री क्षीरसागर, मिनाक्षी शिंगडे, शालुबाई कांबळे, शिवानंद हेंगणे, बाळासाहेब टाकळगावकर, मोजिद पटेल, निवृत्ती कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले, शेतकरी, शेतमजुरांना रोजगार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत़ शेतीला जोडधंदा म्हणून मतदारसंघात दुग्धव्यवसाय, फळबागा आदी उद्योग उभारण्यात येतील़ सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले़ अध्यक्ष समारोप माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी केला़ यावेळी उमेदवार बाबासाहेब पाटील यांचेही भाषण झाले़४शेतकरी कुटुंबांशी आमची नाळ जुळली असल्याने आम्ही शेतकऱ्याच्या हितासाठीच काम केले़ दिल्लीची सत्ता आता आमच्याकडे नाही, परंतु ती कशी वाकवायची हे तुमच्या हातात आहे़ या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही संधी आली आहे़ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत़ महाराष्ट्रात, देशात काय करणार हे सांगण्यापेक्षा ते आमच्यावर टिका करीत आहेत़ मी ७ वेळा विधानसभा आणि ७ वेळा लोकसभा अशा १४ निवडणुका जिंकल्या आहेत़ मग असा माणूस निवडणुकांना घाबरतो का, असेही शरद पवार म्हणाले़ गेल्या काही महिन्यात केंद्र सरकारने घेतलेले निर्णय शेतकऱ्याच्या हिताविरोधात आहेत़ साखरेचे अनुदान बंद केले आहे़ ऊसाचे भाव पडत आहेत़ सोयाबीन तेलाची आयात सुरु केल्याने ३८०० रूपयाचे सोयाबीन २८०० रुपयावर येऊन ठेपले आहे़ कांदा निर्यात बंद केली आहे़ त्यामुळे त्याचेही भाव घसरले़ कापसाचीही अशीच अवस्था आहे़ शेतकऱ्याच्या मालाला चार पैसे अधिक मिळावेत ही भावना सरकारची नाही़