शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

परळी तालुक्यात दूध उत्पादन घटले

By admin | Updated: August 3, 2014 01:24 IST

परळी : तालुक्यात पेरणीपुरता पाऊस झाला़ त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने खरीपाची पेरणी केली़ परंतु

 

 परळी : तालुक्यात पेरणीपुरता पाऊस झाला़ त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने खरीपाची पेरणी केली़ परंतु महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी आता हवालदिल झाला आहे़ सोयाबीन, कापूस या महत्वाच्या पिकांनी माना टाकल्या आहेत़ मूग, हायब्रीड ही पिकेही हातची गेली आहेत़ तसेच हिरवा चारा नसल्याने दुधाळ जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून वर्षभर संसाराचा गाडा कसा हाकायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे़

परळी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय चालविला जातो़ मात्र यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे़दूध उत्पादन घटलेमहिन्यापासून पावसाने दडी मारल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ पाण्याची समस्या उद्भवत आहे़ परिणामी दुधाचे उत्पादन घटले आहे़ खरीप पिकांनी माना टाकल्या असून चार दिवसांमध्ये पाऊस न पडल्यास हातची पिके जाण्याची शक्यता आहे, असे नागापूरचे शेतकरी मनोज मस्के यांनी सांगितले़दूध संघास फटकापरळी तालुका दूध संघाच्या कार्यालयात तालुक्यातील शेतकरी दररोज ५०० लिटर दूध विक्रीसाठी आणत होते़ मात्र आता यामध्ये ३०० लिटरची घट झाली असून २०० लिटरच दूध विक्रीसाठी येत आहे, असे दूध संघाच्या वतीने सांगण्यात आले़शासनाने उपाययोजना कराव्यातपावसाअभावी परळी तालुक्यातील पिके धोक्यात आली आहेत़ यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे़ जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने शेतकरी जनावरे बाजारात दाखल करु लागला आहे़ शासनाने यावर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी भाजपचे श्रीहरी मुंडे यांनी केली आहे़पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीरपावसामुळे पिकेही तर सुकूच लागली आहेत शिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ अनेक गावांना आजही पाणीटंचाई जाणवत आहे़ काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ पिण्याचे पाणी पुरविण्याबरोबरच शासनाने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही तालुक्यातील शेतकऱ्यांमधून पुढे येत आहे़ (वार्ताहर)

परशासनाकडून मदतीची अपेक्षा महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल

४पाऊस नसल्याने हिरव्या चाऱ्याचा प्रश्न बनला गंभीर४हिरवा चारा नसल्याने दुधाळ जनावरे बाजारात विक्रीला४पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बनला गंभीर४तालुक्यात ३०० लीटरने दूध उत्पादनात घट