शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

मराठवाड्यातील नळयोजनांना साडेसोळा कोटींची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:20 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात सध्याच दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये ४०० च्या आसपास टँकरचा आकडा गेला आहे. पाण्याचे स्रोत ...

ठळक मुद्देटंचाईच्या झळा : ४८९ प्रादेशिक नळ योजनांची विशेष दुरुस्ती मोहीम

औरंगाबाद : मराठवाड्यात सध्याच दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये ४०० च्या आसपास टँकरचा आकडा गेला आहे. पाण्याचे स्रोत आटू लागले असून, प्रादेशिक नळ योजनांच्या विशेष दुरुस्ती मोहिमेत विभागातील ४८९ योजनांवर १६ कोटी ४१ लाख रुपयांचा चुराडा होण्याची शक्यता आहे. नळ योजनांच्या पाण्याचे स्रोत आटलेले असताना टंचाई कृती आराखड्यात ४६३ गावे आणि २६ वाड्यांसाठी नळ दुरुस्ती योजनांचा विचार विभागीय प्रशासनाने केला आहे.सद्य:स्थिती पाहता डिसेंबर-जानेवारी अखेरपर्यंत संपूर्ण मराठवाडाच दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असेल. दुष्काळी तालुक्यांमध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेऊन शासनाने ३१ आॅक्टोबर रोजी राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये गंभीर, तसेच मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला. त्यामध्ये मराठवाड्यातील २७ तालुक्यांत गंभीर, तर १४ तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर केले. त्यानंतर ६ नोव्हेंबर रोजी घोषित १५१ तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांतील २६८ मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला. त्यात मराठवाड्यातील २० तालुक्यांतील ६८ मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.तीन जिल्ह्यांत सर्वाधिक खर्चऔरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातील नळ योजनांच्या दुरुस्तीसाठी सर्वाधिक खर्च लागणार आहे. एकूण टंचाई कृती आराखड्यात या तीन जिल्ह्यांत १४ कोटी रुपयांच्या आसपास रक्कम खर्च होणे अपेक्षित आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ८४ गावांतील ८४ योजनांची दुरुस्ती करावी लागणार आहे. जालना जिल्ह्यातील २०४ गावांतील आणि १३ वाड्यांतील २१७ योजनांच्या दुरुस्तीचे नियोजन प्रशासनाने केले आहे. बीड जिल्ह्यातील १३८ गावांत १४७ योजनांच्या दुरुस्तीची गरज आहे.प्रादेशिक नळ योजनांच्या दुरुस्तीचा खर्चजिल्हा योजना गावे अपेक्षित खर्चऔरंगाबाद ८४ ८४ २ कोटी ७५ लाखजालना २१७ २०४ ५ कोटी ५१ लाखबीड १४७ १३८ ५ कोटी ५३ लाखपरभणी ०० ०० -------------हिंगोली ०० ०० -------------नांदेड ०७ ०५ २९ लाख ५० हजारउस्मानाबाद ०० ०० -------------लातूर ३४ ३२ २ कोटी २२ लाखएकूण ४८९ ४६३ १६ कोटी ४१ लाखएकाही योजनेचे काम नाहीसध्या मराठवाड्यात कुठेही पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू नाही. काम सुरू नसल्यामुळे प्रगतिपथावरील कामाची माहिती प्रशासनाने वरिष्ठ पातळीवर पाठविलेली नाही. विंधन विहीर दुरुस्ती करणे व नव्याने खोदणे, तात्पुरत्या पूरक योजना, टँकर आणि बैलगाडीने पाणीपुरवठा, विहीर अधिग्रहण, विहिरी खोल करून गाळ काढणे, बुडक्या घेण्यासारखे उपाय प्रशासनाने टंचाईच्या अनुषंगाने केले आहेत.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई