शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या पैशांचे आॅडिट व्हावे

By admin | Updated: June 2, 2014 01:33 IST

औरंगाबाद : सरकारी तिजोरीत जमा होणारा पैसा सामान्य जनतेने गाळलेल्या घामाचा असतो. सरकारी योजनेच्या नावाखाली या पैशांचा वापर भांडवलदार करून नफा कमवत आहेत.

औरंगाबाद : सरकारी तिजोरीत जमा होणारा पैसा सामान्य जनतेने गाळलेल्या घामाचा असतो. सरकारी योजनेच्या नावाखाली या पैशांचा वापर भांडवलदार करून नफा कमवत आहेत. हेच बडे भांडवलदार कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून बँकांना पर्यायाने सरकारला लुटत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी आता सरकारी पैशांचे सार्वजनिक आॅडिट होणे आवश्यक आहे, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार पी.साईनाथ यांनी केली. आॅल इंडिया बँक आॅफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या (एआयबीओएमईए) सहाव्या अधिवेशनाच्या रविवारी दुसर्‍या दिवशी सकाळच्या सत्रात पी. साईनाथ यांचे व्याख्यान झाले. व्यासपीठावर आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी सी. एच. वेंकटाचलम यांची प्रमुख उपस्थिती होती. पी. साईनाथ यांनी जागतिक बँकिंगची आणि देशातील बँकिंग व्यवस्थेची अभ्यासपूर्ण माहिती दिली. ते म्हणाले, जगात मंदी असताना भारतात राष्ट्रीयीकृत बँकांनी अर्थव्यवस्था टिकवून ठेवलीच नव्हे तर देशाला आर्थिक संकटापासून वाचविले. मात्र, आता या राष्ट्रीयीकृत बँकांचे खाजगीकरण करा, असा अहवाल नायक समितीने दिला आहे. नायक कमिटीचा अहवाल संपूर्णपणे चुकीचा आहे. हा अहवाल फेटाळण्यात यावा, असे आवाहनही त्यांनी केले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी बड्या उद्योगपतींना दिलेले कर्ज लाखो कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे. हे कर्ज वसूल करताना बँकांच्या नाकीनऊ येत आहे. सामान्य ग्राहकांनी बँकेत विश्वासाने ठेवलेल्या पैशांचा भांडवलदार गैरवापर करून स्वत:ची संपत्ती वाढवत आहेत. हमाल, कष्टकरी, कर्मचारी, सेवानिवृत्तांच्या घामाच्या पैशांवर भांडवलदारांनी डल्ला मारला आहे, असे साईनाथ म्हणाले. सरकारी पैसा जनतेच्या कल्याणासाठीच वापरला गेला पाहिजे. भांडवलदारांच्या फायद्यासाठी नव्हे. यासाठी सरकारी पैशांचे सार्वजनिक आॅडिट झाले पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. व्यासपीठावर एआयबीओएमईएफचे अध्यक्ष विश्वास उटगी, महासचिव देवीदास तुळजापूरकर, स्वागत समितीचे अध्यक्ष जगदीश भावठाणकर आदी उपस्थित होते. अधिवेशनास देशभरातून महाराष्ट्र बँकेचे ५०० कर्मचारी उपस्थित होते. ग्राहक व कर्मचार्‍यांना येणार्‍या प्रश्नांवर अधिवेशनात दिवसभर चर्चा झाली व दोन दिवसांच्या अधिवेशनाची सांगता झाली. इन्कम टॅक्स रिटर्न आॅनलाईन करा देशात इन्कम टॅक्स भरणार्‍यांची संख्या कमी आहे. कारण इन्कम टॅक्स वाचविण्यासाठी माहिती लपविली जाते. याचा शासनाच्या तिजोरीवर मोठा परिणाम होतो. यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न आॅनलाईन केले पाहिजे. यात पंतप्रधानांपासून सर्वांचे इन्कम टॅक्स रिटर्न आॅनलाईन दिसले पाहिजे. तसेच या करप्रणालीत पारदर्शकता आणली पाहिजे. यासाठी एआयबीईए संघटनेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन पी. साईनाथ यांनी केले.