शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नॅशनल हायवेने केला पाणीपुरवठा योजनेचा सत्यानाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 19:37 IST

चूक कुणाची? शिक्षा कुणाला? शहरातील अठरा लाख नागरिकांना पाण्याची प्रतीक्षा, तरी...

छत्रपती संभाजीनगर : शहराला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. १८ लाख नागरिक दोन दशकांपासून पाणी पाणी करीत आहेत. शहरातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटावा या दृष्टीने २७४० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नॅशनल हायवे या दोन शासकीय कार्यालयांच्या वादात आता ही योजना अडकली आहे. त्यामुळे मार्च २०२५ मध्ये शहराला मुबलक पाणी मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.

पाणीपुरवठा योजनांचे काम करण्यासाठी अत्यंत निपुण आणि तरबेज असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे राज्य शासनाने छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सोपवले. योजनेचे काम लवकर व्हावे आणि शहराला पाणी मिळावे या दृष्टीने औरंगाबाद खंडपीठ दर महिन्याला आढावा घेत आहे. त्याचप्रमाणे खंडपीठाच्या आदेशानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांची समितीसुद्धा स्थापन केलेली आहे. या समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त असून, दर महिन्याला योजनेच्या कामाचा आढावा घेण्यात येतो. योजनेला निधी कमी पडू नये म्हणून आतापर्यंत केंद्र आणि राज्य शासनाने जवळपास पंधराशे कोटी रुपये दिले. योजनेचे काम ७४ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येतोय. मार्च २०२५ मध्ये शहराला मुबलक पाणी मिळेल, असेही सांगण्यात आले. सध्या निर्माण झालेली परिस्थिती पाहता शहराला तीन महिन्यानंतर पाणी मिळेल, ही शक्यता आता जवळपास मावळली आहे.

नेमका वाद आहे तरी काय?जायकवाडी ते नक्षत्रवाडी हे अंतर ३९ किलोमीटर आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने २५०० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी ३४ किमी टाकली. टाकण्यात आलेल्या जलवाहिनीवर नॅशनल हायवेने रस्ता तयार केला. वास्तविक कोणत्याच जलवाहिनीवर रस्ता तयार करण्यात येत नाही. उद्या जलवाहिनी फुटली तर रस्त्यावरील वाहन तब्बल दीडशे फूट उंच उडेल याला जबाबदार कोण? नॅशनल हायवेलासुद्धा माहीत होते की, जलवाहिनीवर रस्ता तयार करता येत नाही तरीही त्यांनी केला. जलवाहिनीवर रस्ता तयार करत असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी काम का थांबवले नाही? जलवाहिनीची लवकरच हायड्रोलिक टेस्टिंग घ्यावी लागणार आहे. त्यापूर्वी रस्ता हलवणे गरजेचे झाले आहे. त्याशिवाय जलवाहिनीची टेस्टिंगसुद्धा रखडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका