शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

Maharashtra Bandh : बहुराष्ट्रीय कंपन्यांवरील हल्ल्यानंतर मुंबई मुख्यालयातील अधिकारी शहरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 3:08 PM

बंददरम्यान बहुराष्ट्रीय कंपन्यांवर झालेल्या हल्ल्याची उद्योगांच्या मुख्यालयांनी गंभीर दखल घेतली असून विविध कंपन्यांचे अधिकारी मुंबईहून शहरात दाखल झाले. 

औरंगाबाद : वाळूज एमआयडीसीतील बंददरम्यान बहुराष्ट्रीय कंपन्यांवर झालेल्या हल्ल्याची उद्योगांच्या मुख्यालयांनी गंभीर दखल घेतली असून विविध कंपन्यांचे अधिकारी मुंबईहून शुक्रवारी शहरात दाखल झाले. 

मुंबई मुख्यालयाहून बहुतांश अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ शुक्रवारी सकाळच्या विमानाने औरंगाबादेत दाखल झाले. या अधिकाऱ्यांनी पोलीस तक्रारीच्या अनुषंगाने विमा कंपन्यांचे पेपर्स, आॅडिट आदीबाबतची पूर्ण माहिती घेतली. आंदोलकांनी केलेल्या तोडफोडीचे मोबाईल चित्रीकरणाचे फुटेज मुख्यालयांना पाठविण्यात आल्याचे काही स्थानिक उद्योग अधिकाऱ्यांनी सांगितले. सीमेन्स कंपनी आज बंद होती. कंपनीच्या नेमबोर्डपासून ते कँटीन, बाह्य सुशोभीकरणापर्यंतचा पूर्ण भाग आंदोलकांनी तोडफोड केला. वाहनांची तोडफोड केली, त्यामध्ये चारचाकी, दुचाकींचा व लॉजिस्टिक्सच्या वाहनांचा समावेश होता.

या तोडफोडप्रकरणी कंपनीच्या मनुष्यबळ विभागाने माध्यमांना काहीही माहिती दिली नाही. एनआरबी कंपनीच्या मुंबईहून आलेल्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या नुकसानीचा आढावा घेतला. मालकांनी थेट विचारणा करून हा प्रकार कशामुळे घडल्याची विचारणा केली. दरम्यान, चाकणच्या औद्योगिक क्षेत्रात झालेल्या हल्ल्यानंतर ९ आॅगस्ट रोजी औरंगाबादमध्येही औद्योगिक क्षेत्रात झालेल्या तोडफोडीची संपूर्ण औद्योगिक क्षेत्रासह पोलिसांमध्येही  चर्चा होती. या दोन्ही घटनांमागे अन्य काही ‘कनेक्शन’ आहे का याबाबतही पोलीस तपास करणार आहेत. 

मनुष्यबळ विभागातील डाटा करप्टबहुतांश कंपन्यांमधील सुरक्षा आणि मनुष्यबळ विभागाचे चेंबर्स आंदोलकांनी फोडले. त्या तोडफोडीमध्ये मनुष्यबळ विभागातील संगणक व इतर साहित्याचा चुराडा झाला. काही संगणकांमध्ये कंपनीच्या महत्त्वाच्या व्यवहारांचा, कर्मचाऱ्यांशी निगडित असा डाटा होता. संगणक विशेषत: लॅपटॉप फोडण्यात आल्यामुळे बहुतांश मजकू र (डाटा) करप्ट झाल्याची माहिती मिळाली. 

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षणWaluj MIDCवाळूज एमआयडीसी