शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

ऋणानुबंधाच्या जुळल्या गाठी

By admin | Updated: September 23, 2014 01:36 IST

प्रताप नलावडे , बीड एकाच पक्षात राहूनही एकमेकांच्या विरोधात कुरघोडीचे राजकारण करीत पारंपारिक वैर जपणाऱ्या राष्ट्रवादीच्या चार नेत्यांचे ‘शिवछत्र’वर रविवारी मनोमिलन झाले.

प्रताप नलावडे , बीडएकाच पक्षात राहूनही एकमेकांच्या विरोधात कुरघोडीचे राजकारण करीत पारंपारिक वैर जपणाऱ्या राष्ट्रवादीच्या चार नेत्यांचे ‘शिवछत्र’वर रविवारी मनोमिलन झाले. गेली अनेक वर्षांपासून एकमेकांचा उंबरठाही न ओलांडलेल्या या सगळ्यांनी अखेर अमरसिंह पंडित यांच्या ‘शिवछत्र’चा उबंरठा ओलांडत एकमेकांची गळाभेट घेतली आणि एकमेकांच्या हातात हात घालून यापुढे राजकीय वाटचाल करण्याचे निश्चित झाले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणातील एका वेगळ्या पर्वाची सुरूवात झाल्याची चर्चा होत आहे.आ. अमरसिंह पंडित यांच्या ‘शिवछत्र’ या निवासस्थानी रविवारी पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, गेवराईचे आ़ बदामराव पंडित, आणि मोहनराव जगताप हे सर्वजण एकत्र आले आणि पारंपरिक राजकीय वैराला मुठमाती देत एकदिलाने कामाला सुरूवात केली. यावेळी राज्यमंत्री सुरेश धसही उपस्थित होते. राष्ट्रवादीत नेते मंडळीत असलेले मतभेद या निमित्ताने संपुष्टात आल्याचे दिसू लागले आहे. अमरसिंह पंडित यांचे कडवे विरोधक बदामराव यांनी निवासस्थानी आल्यानंतर पहिल्यांदा आपले काका शिवाजीराव पंडित यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयसिंह पंडित यांना शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री क्षीरसागर यांनीही विजयसिंह यांना शुभेच्छा दिल्या. याचवेळी त्यांच्या अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारीवरही एकमताने शिक्कामोर्तब केले.बीड जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे भलेही वर्चस्व असले तरी एका नेत्याचे दुसऱ्या नेत्याशी पटत नाही, अशीच काहीशी परिस्थिती आहे. प्रत्येकाच्या वेगळ्या चुली असल्यामुळे राष्ट्रवादीला जिल्ह्याच्या राजकारणात संघटितपणे दबदबा आजवर निर्माण करता आला नाही. राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित आणि गेवराईचे राष्ट्रवादीचे आमदार बदामराव पंडित या चुलत भावांमधून आजवर आडवा विस्तव जात नव्हता. गेवराईत एकमेकांच्या विरोधात त्यांनी टोकाची भूमिका बजावली आहे. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर आणि अमरसिंह पंडित यांच्यामधील वाद तर पारंपारिक राजकीय वैर म्हणावा लागेल.बदामराव आणि अमरसिंह यांच्यातील मतभेदाची सुरूवात १९९१ च्या पंचायत समितीच्या सभापती निवडीवरून झाली. गेवराई पंचायत समितीच्या सभापतीपदावर बदामराव पंडित यांनी हक्क सांगितला असतानाही शिवाजीराव पंडित यांनी पुतण्याला डावलत मुलगा अमरसिंह यांना सभापतीपद दिले. यावरून पडलेली ठिणगी इतकी विकोपाला गेली की बदामराव यांनी १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत दस्तूरखुद्द शिवाजीराव पंडित यांच्या विरोधातच शड्डू ठोकले आणि त्यांना पराभूतही केले. यानंतर १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अमरसिंह यांनाही पराभूत केले. दरम्यानच्या काळात या दोघांमधील राजकीय वैर वाढतच गेले. हे दोघेही सध्या राष्ट्रवादीत एकाच पक्षात कार्यरत असले तरी दोघांचेही गेवराईत दोन गट सक्रिय होते. गत लोकसभा निवडणुकीत या दोन्ही पंडितांना शरद पवार यांनी एकाच व्यासपीठावर आणत मतभेद संपुष्टात आल्याचे संकेत देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या सभेनंतर त्या निवडणुकीच्या प्रचारात हे दोघेही पुन्हा एकत्र दिसले नाहीत. त्यामुळे केवळ पक्षाच्या अध्यक्षांनी आदेश दिल्याने तांत्रिकदृष्ट्या एकत्र आलेल्या दोन्ही पंडितांचे मनोमिलन काही झालेच नाही.पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यात आणि अमरसिंह पंडित यांच्यातही राजकीय वैर अनेक वर्षांपासून सुरूच होते. १९९० च्या निवडणुकीत यापूर्वी एकदा क्षीरसागर आणि पंडित एकत्र आले होते. परंतु त्यानंतर पुन्हा त्यांच्यातील राजकीय वैर सुरूच राहिले आणि आजवर ते कायम होते. अडीच वर्षापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड होण्यापूर्वी क्षीरसागर यांच्या निवासस्थानी पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अमरसिंह यांनी, आपण कोणाच्या बंगल्यावर बैठकीसाठी जात नाही, असे म्हणत आपल्या सदस्यांसह थेट जिल्हा परिषदेत जाणे पसंत केले होते. २००१ मध्ये डॉ. भारतभूषण क्षीरसागर नगराध्यक्ष झाल्यानंतर क्षीरसागरांना राजकीय विरोध करणाऱ्या पंडितांच्या याच ‘शिवछत्र’समोर फटाके फोडून क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता. शिवाजीराव पंडित यांनीही एकदा केशरकाकू क्षीरसागर यांचा पराभव केल्याशिवाय डोक्यावर टोपी घालणार नसल्याची भीष्मप्रतिज्ञा केली होती. राजकारणात नेहमीच एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या या नेत्यांनी बेरजेचे राजकारण करीत जिल्हा परिषदेच्या निमित्ताने एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर या सर्वांचे ‘शिवछत्र’ वर मनोमिलन झाले.सध्याची बीड जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील धुसफूस एकमेकांसाठी घातक असल्याचीच चर्चा होती. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर जिल्ह्यात निर्माण झालेली सहानुभूतीची लाट आणि आमदार पंकजा पालवे यांनी भाजपाची सूत्रे हाती घेत राजकीय समीकरणे जुळविण्यास केलेली सुरूवात राष्ट्रवादीसाठी चिंतेचा विषय बनली होती. त्यातच राष्ट्रवादीचे केज आणि माजलगाव मतदारसंघातील एक वजनदार नेते रमेश आडसकर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात केलेला प्रवेश या नेत्यांना धक्का देणाराच होता. नेमकी याच दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आणि भाजपाची जि.प.मध्ये वाढलेली ताकद सत्तांतराचे संकेत देऊ लागली होती. या पार्श्वभूमीवर या नेत्यांनी एकत्रित येत नशिबाने का होईना परंतु सत्ता मिळविली. आता राष्ट्रवादीच्या या मनोमिलनाचा विधानसभा निवडणुकीत नेमका काय परिणाम होणार आहे, हे पाहणेही पुढील काळात रंजक ठरणार आहे.