शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
3
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
4
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
5
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
9
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
10
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
11
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
12
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
13
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
14
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
15
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
16
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
17
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
18
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
19
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी: भाजप, काँग्रेसकडून बी फॉर्मचे वाटप; तीन-चार दिवसांत उमेदवारही ठरणार
20
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ

२०१६ मध्ये झाले नुकसान; २०१८ मध्ये दिले अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 14:13 IST

दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे पिकांचे आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाने १९ जुलै रोजी अनुदान जाहीर केले.

ठळक मुद्दे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी ४९ कोटी रुपये मिळणार आहेत. 

औरंगाबाद : दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे पिकांचे आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाने १९ जुलै रोजी राज्यभरासाठी ५१५ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी ४९ कोटी रुपये मिळणार आहेत. 

दोन वर्षांपूर्वी झालेल्या नुकसानीचा लाभ दोन वर्षांनी देण्याचे जाहीर होत असल्यामुळे शासन किती गतिमानतेने काम करीत आहे, याचा प्रत्यय येत आहे. महसूल व कृषी विभागाने केलेल्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे पिकांचे ३३ टक्के व त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्यांना ही मदत मिळणार आहे. ही रक्कम बँक खात्यावर जमा करण्यात  येणार असून त्यातून बँकेने खातेदारांच्या खात्यातून कोणतीही थकबाकी वसूल करू नये, अशा सूचना शासनाने विभागीय आयुक्तांना केल्या आहेत. 

औरंगाबादला फक्त ५१ लाखऔरंगाबाद जिल्ह्यातील २४८८ शेतकऱ्यांना ५१ लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे. सुमारे साडेतीन हजार रुपये प्रती हेक्टरी शेतकऱ्याच्या खात्यावर जाणे अपेक्षित आहे. पीक विमा नुकसानभरपाईच्या ५० टक्क्यांप्रमाणे ही मदत देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. १६ व १७ सप्टेंबर २०१६ रोजी जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले होते. दोन वर्षांनंतर शासनाने तुटपुंजी का होईना शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. 

मराठवाड्याला दिले ४९ कोटीमराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी शासनाने ४९ कोटी रुपये दिले आहेत. २१ लाख ५० हजार २८४ शेतकऱ्यांना ती मदत मिळणार आहे. यामध्ये औरंगाबादला ५१ लाख, परभणी ५० लाख, हिंगोली सव्वाकोटी, नांदेड २६ कोटी, बीड ६ कोटी तर लातूरला ५ कोटी, उस्मानाबादला ११ कोटी असे सुमारे ४९ कोटींच्या आसपासची रक्कम विभागाला मिळणार आहे. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारfundsनिधीFarmerशेतकरी