शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
9
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
10
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
11
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
12
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
13
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
14
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
15
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
16
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
17
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
18
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
19
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
20
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम खात्याच्या कार्यालयाला कुलूप!

By admin | Updated: July 7, 2014 00:15 IST

जालना : शासनाचे कोट्यवधी रूपये खर्च करून अनेक कामे करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला तीन वर्षांपासून कुलूप आहे.

जालना : शासनाचे कोट्यवधी रूपये खर्च करून अनेक कामे करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला तीन वर्षांपासून कुलूप आहे. एकही अधिकारी या कार्यालयात पाय ठेवण्यास तयार नाही. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्यानंतर कोणीच जिल्ह्याच्या प्रशासनावर पकड बसवू शकला नाही. पालकमंत्री राजेश टोपे व जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांना तर ही मंडळी अजिबात जुमानत नसल्याचे चित्र आहे. बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता राजपूत यांनी सांगितले, जालना येथे गुंडांचा त्रास होत असल्याने आपण कार्यालयात थांबत नाही. पोलिसांकडून संरक्षण मिळत नाही. चौकीत कोणीच थांबत नाही. कोट्यवधी रूपयांची देयके अदा करतांना संचिकाच शासनाच्या नियमाप्रमाणे चालत नसल्याने या कार्यालयाचा कारभार पार खाजगीच्या पलिकडे झाला आहे. कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, लेखापाल, वरिष्ठ लिपिक, कार्यालयीन अधीक्षक, कारकून ही मंडळीही कार्यालयात थांबत नाही. त्यामुळे हे शासकीय कार्यालये केवळ शोभेची वस्तू बनली की काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. विकास कामांना सुरूवात करताना अभियंत्यांचे मार्गदर्शन आवश्यक आहे. पाहणी होऊन गुणवत्ता तपासली जाण्याची गरज आहे. मात्र असे काहीच होत नसल्याच्या तक्रारी आहे. गुणवत्ता विभागाकडून मिळालेल्या प्रमाणपत्रानुसार कामांची तपासणी करण्यात आली तर हे प्रमाणपत्रच बोगस असल्याचे दिसून येईल, असे जाणकारांचे मत आहे. या कार्यालयाचा कारभार इतका अजब झाला आहे की, कार्यकारी अभियंता यांनी एक जाधव नावाचा एजंट नेमला आहे. त्याच्यामार्फत गेलेली संचिकेचेच धनादेश अदा केले जातात. उर्वरित कामांची देयके अदा केली जात नाही. (प्रतिनिधी)