शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

नेत्यांनो खबरदार, छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेविषयी वक्तव्ये कराल तर: हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 12:28 IST

प्रकरण न्यायप्रविष्ट असताना विसंगत वक्तव्यांमुळे संभ्रम, औरंगाबाद उच्च न्यायालयाने फटकारले

छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेबद्दल कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशी एकमेकांशी विसंगत जाहीर वक्तव्ये करू नयेत, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. आर. जी. खोब्रागडे यांनी गुरूवारी तीव्र नाराजी व्यक्त करत नेत्यांना फटकारले.

याबाबत संबंधितांना उच्च न्यायालयाची तीव्र नाराजी कळवू, असे आश्वासन राज्य सरकारच्यावतीने मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांनी दिले. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना नुकतेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ‘संभाजीनगरची पाणी योजना मीच आणली’, ‘डिसेंबरपर्यंत शहराला नवीन पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा करू’, तसेच ‘योजनेची सद्य:स्थिती पाहता डिसेंबरपर्यंत शहराला नवीन पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होऊच शकत नाही,’ अशी लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशी एकमेकांशी विसंगत जाहीर वक्तव्ये केल्याची बाब ‘अमायकस क्युरी’ (न्यायालयाचे मित्र) सचिन देशमुख यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून देत तीव्र नाराजी व्यक्त केली. खंडपीठाने याची गंभीर दखल घेण्याची विनंती त्यांनी केली.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने २५ जून रोजी विभागीय आयुक्तांची नियुक्ती केल्याचे गिरासे यांनी सांगितले. तर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र शासनाने वाळू उत्खननासंदर्भात ‘राज्यस्तरीय पर्यावरण समिती’ गठीत केल्याचे असिस्टंट सॉलिसिटर जनरल अजय तल्हार यांनी सांगितले. खंडपीठाच्या ७ जूनच्या आदेशानुसार पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनी टाकण्यासाठी तोडण्यात आलेल्या झाडांची संयुक्त पाहणी आणि मोजणी करून तोडलेल्या झाडांच्या बदल्यात किती झाडे लावली, याचा अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार जळगाव रोडवरील २६७ झाडे तोडली व त्या बदल्यात २६७० झाडे लावली. तर पैठण रोडवरील ३१७ झाडे तोडून ३१७० झाडे लावल्याचा अहवाल सादर करण्यात आला.

खंडपीठातर्फे गठीत समितीने सादर केलेल्या अहवालात एमजेपीचे मुख्य अभियंता लोलापोड सदस्य नसताना समितीपुढे विसंगत माहिती सादर करत असल्याबद्दल कंत्राटदाराचे वकील आर. एन. धोर्डे यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्याची गंभीर दखल घेत एमजेपीचे वकील राजेंद्र देशमुख यांना संबंधिताला योग्य ती समज देण्यास सांगितले. तर जलवाहिन्यांसाठीच्या खोदकामामुळे शहरातील रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेकडे ॲड. टोपे यांनी लक्ष वेधले. याबाबत ७ जूनच्या आदेशात निर्देश दिल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ