शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

नेत्यांनो खबरदार, छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेविषयी वक्तव्ये कराल तर: हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 12:28 IST

प्रकरण न्यायप्रविष्ट असताना विसंगत वक्तव्यांमुळे संभ्रम, औरंगाबाद उच्च न्यायालयाने फटकारले

छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेबद्दल कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशी एकमेकांशी विसंगत जाहीर वक्तव्ये करू नयेत, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. आर. जी. खोब्रागडे यांनी गुरूवारी तीव्र नाराजी व्यक्त करत नेत्यांना फटकारले.

याबाबत संबंधितांना उच्च न्यायालयाची तीव्र नाराजी कळवू, असे आश्वासन राज्य सरकारच्यावतीने मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांनी दिले. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना नुकतेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ‘संभाजीनगरची पाणी योजना मीच आणली’, ‘डिसेंबरपर्यंत शहराला नवीन पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा करू’, तसेच ‘योजनेची सद्य:स्थिती पाहता डिसेंबरपर्यंत शहराला नवीन पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होऊच शकत नाही,’ अशी लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशी एकमेकांशी विसंगत जाहीर वक्तव्ये केल्याची बाब ‘अमायकस क्युरी’ (न्यायालयाचे मित्र) सचिन देशमुख यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून देत तीव्र नाराजी व्यक्त केली. खंडपीठाने याची गंभीर दखल घेण्याची विनंती त्यांनी केली.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने २५ जून रोजी विभागीय आयुक्तांची नियुक्ती केल्याचे गिरासे यांनी सांगितले. तर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र शासनाने वाळू उत्खननासंदर्भात ‘राज्यस्तरीय पर्यावरण समिती’ गठीत केल्याचे असिस्टंट सॉलिसिटर जनरल अजय तल्हार यांनी सांगितले. खंडपीठाच्या ७ जूनच्या आदेशानुसार पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनी टाकण्यासाठी तोडण्यात आलेल्या झाडांची संयुक्त पाहणी आणि मोजणी करून तोडलेल्या झाडांच्या बदल्यात किती झाडे लावली, याचा अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार जळगाव रोडवरील २६७ झाडे तोडली व त्या बदल्यात २६७० झाडे लावली. तर पैठण रोडवरील ३१७ झाडे तोडून ३१७० झाडे लावल्याचा अहवाल सादर करण्यात आला.

खंडपीठातर्फे गठीत समितीने सादर केलेल्या अहवालात एमजेपीचे मुख्य अभियंता लोलापोड सदस्य नसताना समितीपुढे विसंगत माहिती सादर करत असल्याबद्दल कंत्राटदाराचे वकील आर. एन. धोर्डे यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्याची गंभीर दखल घेत एमजेपीचे वकील राजेंद्र देशमुख यांना संबंधिताला योग्य ती समज देण्यास सांगितले. तर जलवाहिन्यांसाठीच्या खोदकामामुळे शहरातील रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेकडे ॲड. टोपे यांनी लक्ष वेधले. याबाबत ७ जूनच्या आदेशात निर्देश दिल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ