किसान रेल्वेगाड्यांतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:13 IST2021-02-05T04:13:26+5:302021-02-05T04:13:26+5:30
-- औरंगाबाद : इंजिनियारिंग विभागातील कर्मचाऱ्यांनी रेल्वे पटरीच्या देखरेखीचे विशेष परिश्रम घेतल्यामुळे मालगाड्यांची गती वाढली. गेल्या वर्षी २८ किलोमीटर ...

किसान रेल्वेगाड्यांतून
--
औरंगाबाद : इंजिनियारिंग विभागातील कर्मचाऱ्यांनी रेल्वे पटरीच्या देखरेखीचे विशेष परिश्रम घेतल्यामुळे मालगाड्यांची गती वाढली. गेल्या वर्षी २८ किलोमीटर प्रती तास असलेली गती वाढून ४५ किलोमीटर प्रती तास झाली. शेतीमालाच्या वाहतुकी करिता नांदेड रेल्वे विभागातून किसान विशेष रेल्वे चालविण्यात येत आहेत. आतापर्यंत २५ किसान विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात आल्या आहेत, असे नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सांगितले.
मार्च महिन्याअखेरीस आणखी ७५ किसान विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत चालविण्यात आलेल्या २५ किसान रेल्वेमधून नांदेड रेल्वे विभागास ५.२५ कोटींचा महसूल मिळाला आहे. या वर्षी माल वाहतुकीमध्ये नांदेड विभागाने उत्कृष्ट प्रदर्शन करून बसमत, औरंगाबाद आणि परभणी रेल्वे स्थानकावरून विविध ठिकाणी १२ साखरेचे रॅक पाठविल्याचेही सिंग यांनी सांगितले.