शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मराठवाड्यात पाऊस लांबल्याने खरीपाची ९ हजार कोटींची गुंतवणूक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 11:37 IST

मराठवाड्याचे खरीप पीकाखालील क्षेत्र ४९ लाख ११ हजार हेक्टर असून त्यापैकी ४४ लाख १९ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.

ठळक मुद्देमराठवाड्यात साधारण महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविली आहे.यामुळे शेतीमधील अंदाजे ८ ते ९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक संकटात आली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्याचे खरीप पीकाखालील क्षेत्र ४९ लाख ११ हजार हेक्टर असून त्यापैकी ४४ लाख १९ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. साधारण महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने अंदाजे ८ ते ९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक संकटात आली आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आणि काही प्रमाणात उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यात अपेक्षित पावसापेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामाची दुबार पेरणी करणेही अवघड असून दुष्काळाच्या उंबरठ्यावर मराठवाडा उभा आहे. येत्या काही दिवसांत अपेक्षित पाऊस झाला नाही तर परिस्थिती आवाक्याबाहेर जाण्याची चिन्हे आहेत. आॅगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झालेला आहे. या महिन्यांत दुबारपेरणी कशी करणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतांना कृषि विभागाने मराठवाड्यात दुबारपेरणीचे संकट असल्याचा अहवाल विभागीय प्रशासनाला गेल्या आठवड्यात दिला आहे.

विभागात मका २ लाख ३५ हेक्टरवर पेरणी करण्यात आला आहे. कापूस १४ लाख ३२ हजार हेक्टर (बोंडअळीच्या संकटाने पीक धोक्यात), तूर ४ लाख ३३ हजार हेक्टर, मूग १ लाख ६२ हजार हेक्टर, उडीद १ लाख ४५ हजार हेक्टर, सोयाबीन १७ लाख ५१ हजार हेक्टर, बाजरी १ लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. या सर्व पिकांना पावसाची आवश्यकता आहे. या सर्व पिकांच्या पेरण्याचा खर्च वेगवेगळा असतो. यातील मका, कापूस, सोयाबीन पेरणीचा खर्च जवळपास सारखाच असतो. कडधान्य व बाजरी पेरणीचा खर्च तुलनेने थोडा कमी येतो.

१५ ते २० हजारांचा हेक्टरी खर्च नांगरणीसाठी २५०० रुपये हेक्टरी खर्च झाला आहे. मोगडण्यासाठी १२५० रुपये, चरी पाडण्यासाठी १२५० रुपये, ५ हजार रुपयांचे बियाणे  हेक्टरी लागतात. निंदण्यासाठी ३ हजार ७५० रुपये हेक्टरी खर्च झाला आहे. १०:२६ च्या खतांच्या दोन बॅगा हेक्टरी लागल्या आहेत. शिवाय युरिया आणि फवारणीचा खर्च वेगळा झाला आहे. वखरण्यासाठी १२५० रुपये हेक्टरी खर्च झाला आहे. ४ वेळा शेतकऱ्यांनी वखरणी केली आहे. या सगळ्या खर्चाची गोळाबेरीज केली तर सरासरी १५ ते २० हजार रुपये हेक्टरी खर्च शेतकऱ्यांनी केला आहे. काही ठिकाणी जास्तीचा खर्च झाला असल्याचे गंगापूर तालुक्यातील आंबेगाव येथील शेतकरी मनोहर थोरात यांनी सांगितले. 

विभागीय महसूल उपायुक्त म्हणतात...मराठवाड्यातील खरीप हंगामाबाबत सोमवारी सचिव पातळीवर आढावा घेण्यात आला. खत, पेरणी, बियाणे, मजुरी, नांगरणी व इतर शेतीकामांच्या खर्चात वाढ होत आहे. विभागातील खरीप हंगामात शेतीमध्ये झालेल्या गुंतवणुकीचा निश्चित आकडा सांगणे अवघड आहे. परंतु जी काही गुंतवणूक विभागातील शेतकऱ्यांनी केली, ती पावसाअभावी संकटात असल्याचे प्रभारी महसुल उपायुक्त शिवानंद टाकसाळे यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस