शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
2
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
3
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
4
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
7
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
8
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
9
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
10
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
11
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
12
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
13
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
19
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
20
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगाम आला धोक्यात

By admin | Updated: August 14, 2014 02:08 IST

सेलू : वरूणराजाने दांडी मारल्यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिके धोक्यात सापडली असून मुगाचे शंभर टक्के नुकसान झाल्यात जमा आहे़

सेलू : वरूणराजाने दांडी मारल्यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिके धोक्यात सापडली असून मुगाचे शंभर टक्के नुकसान झाल्यात जमा आहे़ तर पावसाअभावी इतर पिकेही सुकू लागली आहेत़
पावसाळयाचे दोन महिने संपले तरीही समाधानकारक पाऊस झालेला नाही़ अल्पश: पावसावर शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली़; परंतु, पावसाने प्रदीर्घ विश्रांती घेतल्यामुळे कापूस, तुर, सोयाबीन ही पिके धोक्यात आली आहेत. तर कडक उन्हामुळे खरीपाची पिके सुकू लागली आहेत़
सेलू तालुक्यात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र आहे़ जवळपास तीस हजार हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे़ बारा हजार हे़वर सोयाबीन, तुर ६ हजार ५०० हे़ व मुगाचे ८ हजार ५०० हे़ क्षेत्र आहे़ आजपर्यंत केवळ १५० मि़मी़ पाऊस झाला आहे़ जून महिन्यात झालेल्या अल्पश: पावसावर शेतकऱ्यांनी पिकाची पेरणी केल्याने वाढ खुंटली आहे़ तर मूग, उडीद या पिकांवर पाऊस नसल्यामुळे सर्वाधिक परिणाम झाला आहे़ कापूस वाढीच्या अवस्थेत असतांना पाऊस नसल्यामुळे झाडांची वाढ खुंटली आहे़ त्यामुळे कापसाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे़
श्रावण महिन्यात येणाऱ्या सणावर तसेच गणेशोत्सव, महालक्ष्मी, पोळा हे सण साजरे करण्यासाठी मुग विकून आर्थिक घडी बसविण्याचा शेतकरी प्रयत्न करतात़ परंतू पावसाअभावी मुगाचे पीक गेल्यामुळे या सणांवर दुष्काळाचे सावट घोंगावत आहे़ वळवाचा पाऊस झाला नाही़ त्यामुळे जमिनीचे तापमान वाढल्याने कापसांच्या पिकांवर परिणाम झाला आहे़ दरम्यान, शेतात पिके सुकत असल्यामुळे शिवार उजाड झाले आहे़ पावसाळयाचे दिवस असतांनाही नदी, नाले कोरडेठाक असल्यामुळे पाणीपातळी खालावत चालल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे़ (प्रतिनिधी)